शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

अतिपावसामुळे पिकांवर रोग

By admin | Updated: August 12, 2016 01:45 IST

संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे.

शेतकरी हवालदिल : तूर करपली तर कपाशी पडली पिवळी कारंजा (घा.) : संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे. सोयाबीनवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. यामुळे पिके हातात येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदाही नापिकीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, भूईमुंग, मुंग आदी पिकांची पेरणी केली. होता नव्हता पैसा लावला. पावसाने चांगली सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला होता. पेरणी साधली. यंदा सुगीचे दिवस येतील, अशी स्वप्ने पाहत असतानाच संततधार पावसाला सुरूवात झाली. ८ जूनला सुरू झालेला पाऊस वाढत गेला. ४ आॅगस्टपर्यंत तालुक्यात एकूण ६१५.२ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ ४३१.४ मिमी पावसाची नोंद होती. गतवर्षी तालुक्यात ९०० किमी एकूण पाऊस झाला. त्या तुलनेत यंदा दोन महिन्यांतच ७० टक्के पाऊस झाला. पावसाचे आॅगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक आहेत. या महिन्यांत पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे मत पर्जन्यमान विभागाने व्यक्त केले आहे. सततच्या पावसामुळे पाणी साचून जमिनीतील हवेचे प्रमाण कमी झाले. यामुळे पिकांवर अनेक रोगांचे आक्रमण होत आहे. सोयाबीनच्या पानांवर रोग आला. तूर करपली. कपाशीची पाने पिवळी पडली आहे. पिकाची वाढ खुंटली आहे. सततच्या पावसामुळे आंतर मशागत करता आली नाही. तण वाढले. निंदणाची कामे खोंळंबली. निंदणाची मजुरीही वाढली. तननाशकही अति पावसामुळे निष्प्रभावी ठरले. एकंदरीत अती पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षी अवृष्टी तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावे लागणार, असे दिसते. तालुक्यात यावर्षी सर्वाधिक ४६ हजार ४१७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणली. चांगले उत्पादन येईल या आशेने शेतकरी अत्यंत परिश्रम घेत आहेत; पण संततधार पावसामुळे मेहनत व्यर्थ ठरणार असल्याचेच चित्र आहे. आणखी काही दिवस पावसाचे सातत्य कायम राहिले तर पिकांना वाचविणे कठीण होणार आहे. यामुळे उपाययोजना सूचविणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)