शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

अतिपावसामुळे पिकांवर रोग

By admin | Updated: August 12, 2016 01:45 IST

संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे.

शेतकरी हवालदिल : तूर करपली तर कपाशी पडली पिवळी कारंजा (घा.) : संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे. सोयाबीनवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. यामुळे पिके हातात येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदाही नापिकीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, भूईमुंग, मुंग आदी पिकांची पेरणी केली. होता नव्हता पैसा लावला. पावसाने चांगली सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला होता. पेरणी साधली. यंदा सुगीचे दिवस येतील, अशी स्वप्ने पाहत असतानाच संततधार पावसाला सुरूवात झाली. ८ जूनला सुरू झालेला पाऊस वाढत गेला. ४ आॅगस्टपर्यंत तालुक्यात एकूण ६१५.२ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ ४३१.४ मिमी पावसाची नोंद होती. गतवर्षी तालुक्यात ९०० किमी एकूण पाऊस झाला. त्या तुलनेत यंदा दोन महिन्यांतच ७० टक्के पाऊस झाला. पावसाचे आॅगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक आहेत. या महिन्यांत पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे मत पर्जन्यमान विभागाने व्यक्त केले आहे. सततच्या पावसामुळे पाणी साचून जमिनीतील हवेचे प्रमाण कमी झाले. यामुळे पिकांवर अनेक रोगांचे आक्रमण होत आहे. सोयाबीनच्या पानांवर रोग आला. तूर करपली. कपाशीची पाने पिवळी पडली आहे. पिकाची वाढ खुंटली आहे. सततच्या पावसामुळे आंतर मशागत करता आली नाही. तण वाढले. निंदणाची कामे खोंळंबली. निंदणाची मजुरीही वाढली. तननाशकही अति पावसामुळे निष्प्रभावी ठरले. एकंदरीत अती पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षी अवृष्टी तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावे लागणार, असे दिसते. तालुक्यात यावर्षी सर्वाधिक ४६ हजार ४१७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणली. चांगले उत्पादन येईल या आशेने शेतकरी अत्यंत परिश्रम घेत आहेत; पण संततधार पावसामुळे मेहनत व्यर्थ ठरणार असल्याचेच चित्र आहे. आणखी काही दिवस पावसाचे सातत्य कायम राहिले तर पिकांना वाचविणे कठीण होणार आहे. यामुळे उपाययोजना सूचविणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)