शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर वर्धा भाजपा नगरसेवकात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:08 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची झाली आर्थिक गोची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीत या असंतोषाची चुणूक दिसली. त्यानंतर भाजपने आपल्या धोरणात कोणतीही दुरूस्ती केली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला गड कायम राखताना बरीच कसरत करावी लागणार आहे.वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सध्या मितेश भांगडीया हे आमदार आहेत. भांगडीया यांचा जनसंपर्क तसा कमी आहे. त्यामुळे नव्या नगर सेवकांशी त्यांचा परिचय नाही. काही भाजपकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. भांगडीया यांच्या जागी भाजपचे प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद व बहुतांश नगरपालिका भाजपच्या हाती आहे. जवळ जवळ ४०० पैकी अडीशेपेक्षा अधिक मतदार भाजपकडे आहेत. मात्र नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष सरकारच्या धोरणाविषयी आहे. काँगे्रसच्या काळात नगर पालिकेतील बहुतांश कामे ही नगरसेवकाच्या माध्यमातूनच गावात करण्यात येत होती. भाजप सरकारने नगर पालिकेचे सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केले आहे. यामागे कामाची गुणवत्ता हे प्रमुख कारण दिले जात आहे. नगर पालिकेकडून काम करण्यात येत नसल्याने नगरसेवकांची मोठी आर्थिक गोची झाली आहे. तसेच भाजपकडून निवडून आलेल्या बरेचशे नगरसेवक हे जुने काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. विधान परिषदेची निवडणूक ही आपल्याला लाभ देणारी असते, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट नगरपालिकेचे राकाँ गटनेते सौरभ तिमांडे यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक लढविली होती. यात त्यांनी ९६ मते मिळविले. भाजपचे अनेक मते या निवडणुकीत फुटली. याची दखल भाजपने घेतली असली तरी पुढे मते फुटू नये यासाठी नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यात काहीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे असंतोष कायम आहे. भाजपची कसोटी यानिमित्ताने लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा