शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर वर्धा भाजपा नगरसेवकात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:08 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची झाली आर्थिक गोची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीत या असंतोषाची चुणूक दिसली. त्यानंतर भाजपने आपल्या धोरणात कोणतीही दुरूस्ती केली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला गड कायम राखताना बरीच कसरत करावी लागणार आहे.वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सध्या मितेश भांगडीया हे आमदार आहेत. भांगडीया यांचा जनसंपर्क तसा कमी आहे. त्यामुळे नव्या नगर सेवकांशी त्यांचा परिचय नाही. काही भाजपकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. भांगडीया यांच्या जागी भाजपचे प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद व बहुतांश नगरपालिका भाजपच्या हाती आहे. जवळ जवळ ४०० पैकी अडीशेपेक्षा अधिक मतदार भाजपकडे आहेत. मात्र नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष सरकारच्या धोरणाविषयी आहे. काँगे्रसच्या काळात नगर पालिकेतील बहुतांश कामे ही नगरसेवकाच्या माध्यमातूनच गावात करण्यात येत होती. भाजप सरकारने नगर पालिकेचे सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केले आहे. यामागे कामाची गुणवत्ता हे प्रमुख कारण दिले जात आहे. नगर पालिकेकडून काम करण्यात येत नसल्याने नगरसेवकांची मोठी आर्थिक गोची झाली आहे. तसेच भाजपकडून निवडून आलेल्या बरेचशे नगरसेवक हे जुने काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. विधान परिषदेची निवडणूक ही आपल्याला लाभ देणारी असते, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट नगरपालिकेचे राकाँ गटनेते सौरभ तिमांडे यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक लढविली होती. यात त्यांनी ९६ मते मिळविले. भाजपचे अनेक मते या निवडणुकीत फुटली. याची दखल भाजपने घेतली असली तरी पुढे मते फुटू नये यासाठी नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यात काहीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे असंतोष कायम आहे. भाजपची कसोटी यानिमित्ताने लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा