शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कृषी अधीक्षकांवर शिस्तभंगाचा ठराव

By admin | Updated: June 24, 2015 02:11 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे.

वर्धा : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने सदस्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे आवश्यक असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे हे जिल्हा परिषदेच्या मागील तीन सभांना सतत दांडी मारत आहे. यावरुन सभाध्यक्ष विलास कांबळे यांच्या पुढाकाराने सभागृहात बऱ्हाटे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, असा ठरावच पारीत केला. याची प्रत प्रधान सचिव(कृषी) यांना पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात.जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी १ वाजतापासून सुरु झालेली जि.प.ची सर्वसाधारण सभा रात्री ८.३० वाजतापर्यंत चालली. विविध मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या शाब्दिक रणकंदनाने सभा चांगलीच गाजली. अशातच १९ महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने पारीत झाले.१७ सामूहिक विकास कार्यक्रमांवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. विरोधी गटाकडून माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, मोहन शिदोडकर, गजानन गावंडे, मनोज चांदुरकर, मोरेश्वर खोडके खिंड लढवत होते. निधीचे नियोजन करण्याचे अधिकार अध्यक्ष व उपाध्यक्षांना द्यावे, असा सूर सत्ताधारी गटाकडून निघाला. सभाध्यक्षांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सत्ताधारी गटाने १५ मताधिक्याने विरोध हाणून पाडत बहुमताने ठराव पारीत केला.१३ व्या वित्त आयोगाचा ३ कोटी ८ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. हा निधी २० सप्टेंबरपर्यंत खर्च करायचा आहे. असा शासन निर्णय आहे. सदस्य राणा रणनवरे व इतर सदस्यांनी पावसाळा असल्यामुळे या निधीतून बांधकामाची कामे करता येणे शक्य नाही. तेव्हा तो इतर विकास कामांकरिता वापरावा, याकडे लक्ष वेधले. विरोधकांनी या निधीचे वाटप समसमान करावे, असा आग्रह धरला; मात्र सत्ताधारी गटापुढे त्यांचे काही एक चालले नाही. याबाबतचे अधिकार सभागृहाने अध्यक्ष व उपाध्यक्षांना देण्याचा ठराव पारीत करण्यात आला. ग्रामीण रस्त्यांसाठी ३०५४ सदराखाली ४ कोटी १५ लाखांचा निधी आहे. यावरही विरोधक आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे हे सभेला गैरहजर असल्याचा मुद्दा खुद्द सभाध्यक्ष कांबळे यांनी उपस्थित केला. मागील तीन सभांना गैरहजर असल्याची बाब पुढे आली. यामुळे शेती विषयक, जलयुक्त शिवार अभियानाशी निगडीत, बी-बियाणांच्या बाबतच्या प्रश्नांवर योग्य उत्तरे मिळत नाही, असा सदस्यांमध्ये असलेला नाराजीचा सूर लक्षात घेता सभागृहाने बऱ्हाटे यांच्यावर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा ठराव बहुमताने पारीत केला. जलयुक्त शिवारमध्ये गौंडबंगाल असल्याच्या चर्चेने आधीच लक्ष्य ठरलेले भाऊ बऱ्हाटे यांच्यापुढील अडचणी या ठरावामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. सभेला श्यामलता अग्रवाल, चेतना मानमोडे, वसंत पाचोडे हे सभापती हजर होते. सीईओचा प्रभार प्रमोद पवार यांनी सांभाळला.(जिल्हा प्रतिनिधी)शालेय गणवेशात अर्थकारण ?जिल्हा परिषद शाळांच्या गणवेशाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. इतकेच नव्हे, सदर गणवेशाची खरेदी विशिष्ट दुकानातूनच करावी, असा ‘संदेश’ तळेगाव(टा.) येथील केंद्रप्रमुख वसंत खोडे हे व्हॉट्सअ‍ॅपव्दारे पाठवत आहे. तेव्हा यामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थकारण असल्याचा आरोपही केला. सभाध्यक्षांने शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना व्हॉट्स अ‍ॅपवरील सदर ‘संदेश’ पाठवावा, ते या प्रकरणाची सखोल चौकशी करतील. यामध्ये सदर केंद्र प्रमुख दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा ठराव पारीत करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवाजिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण हे वर्धेत असताना देखील सर्वसाधारण सभेला गैरहजर होते. व्हिडिओ कॉन्फरन्स असल्यामुळे ते हजर राहू शकले नाही, ही बाब पुढे आली. तेव्हा काही सदस्यांनी दिवसभर व्हिडिओ कॉन्फरन्स होती काय, असा सवाल उपस्थित केला. अखेर सभागृहाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना केल्या. सिंचनाच्या विषयावरही सभेत चांगलेच शाब्दिक रणकंदन झाले.