शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शाळेची जीर्ण इमारत ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्या आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : संभाव्य धोका लक्षात घेता शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इमारती नवीन बांधण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहे. परंतु, जुन्या जीर्ण झालेल्या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे. याकडे मात्र, शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून जुन्या जीर्ण इमारती तत्काळ पाडण्याची मागणी होत आहे.काही वर्षांपूर्वी शासनाने सर्व शिक्षा अभिायानंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी कोटी रुपयांचा निधी खर्च करून नवीन शाळेच्या इमारतींचे बांधकाम केले. शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्या आहेत. भंगार अवस्थेत या जीर्ण इमारती उभ्या असून साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो.काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असून पावसाने जीर्ण इमारती पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.याप्रकाराबात गावातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींना तसेच शिक्षण विभागाला माहिती देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्या गेले. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ जुन्या जीर्ण इमारती पाडण्यात याव्या, मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.जि.प.शाळेचे किचन शेड दुर्लक्षितयेथील जि.प. केंद्र शाळेतील किचनशेड प्रसाधनगृहालगतच उभारण्यात आले आहे. किचनशेडमध्येच पोषण आहार शिजविल्या जाते. आगामी दिवस हे पावसाळयाचे असून पोषण आहारावर माशा बसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. याची माहिती आर्वी येथील गटविकास अधिकाऱ्यांना माहिती असूनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेत जीर्ण झालेली इमारत पाडण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा