शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

सिग्नल यंत्रणेला ‘बांधकाम’चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:36 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल बसविणे तथा त्यासाठीची यंत्रणा उभारणे ही कामे हाती घेण्यात आली होती.

ठळक मुद्देनगर परिषदेने केले काम पूर्ण : स्वयंचलित वाहतूक नियंत्रणासाठी प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल बसविणे तथा त्यासाठीची यंत्रणा उभारणे ही कामे हाती घेण्यात आली होती. यातील नगर परिषदेने आपली कामे पूर्ण केलीत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविलेली कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. यामुळे सिग्नल व्यवस्था सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.वर्धा शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरिता अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत; पण अद्याप त्यात यश आलेले नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी काही काळ यशस्वी प्रयत्न करीत वाहतूक स्वयंचलित पद्धतीने सुरू केली. शिवाय अन्य उपक्रमही राबविले. यातून काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती; पण निरीक्षकाचे स्थानांतरण होताच वाहतुकीची स्थिती जैसे थे झाली. तेव्हापासून शहरातील सिग्नल बंदच आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वयंचलित वाहतूक दिवे सुरू करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतला. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनीही शहरातील सिग्नल सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून नगर परिषद, बांधकाम विभाग तथा अन्य काहींशी बोलणी केली. यावरून एका चमूमार्फत शहराची पाहणी करण्यात आली. यानंतर शहरात आर्वी नाका, शिवाजी कॉलनी, बजाज चौक आदी ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्यात आले. सिग्नल उभारण्याचे काम नगर परिषदेकडे सोपविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत पालिका प्रशासनाने सूचनेप्रमाणे सर्व सिग्नल बसवून दिले; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही आपली जबाबदारी पार पाडलेली नाही.शिवाजी चौक येथील सिग्लनचे खांब दुभाजकांच्या पूढे गेलेले आहेत. यामुळे एखादे वाहन धडकून नवीन खांबांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय दुचाकी धारकांचे अपघात नित्याचे झाले आहेत. असाच प्रकार आर्वी नाका चौकातही घडत आहे. बांधकाम विभागाकडे सदर सिग्नलच्या खांबांपर्यंत रस्ता दुभाजक वाढविणे, तेथे आयलाईन तयार करून देणे आदी कामे सोपविण्यात आली होती; पण त्या कामांचा अद्याप मुहूर्तही निघाला नाही. परिणामी, शहरातील सिग्नल आजही केवळ शोभाच वाढवित असल्याचे दिसते. याबाबत वाहतूक नियंत्रक शाखेने जिल्हाधिकाºयांना पत्र दिले असून कार्य कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब ठरताहेत धोकादायकमोठ्या शहरांप्रमाणे वर्धेतील वाहतूक स्वयंचलित दिव्यांद्वारे नियंत्रित करता यावी म्हणून पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेने पुढाकार घेत पाठपुरावा केला. यावरून नगर परिषदेने दिव्यांसह सिग्नलचे खांब उभारून दिले. सदर खांब रस्त्यांच्या मध्यभागी उभारण्यात आले आहेत. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या खांबांपर्यंत दुभाजकांची निर्मिती करणे, तेथे चबुतºयाची निर्मिती करणे तथा आयलाईन तयार करून देणे गरजेचे होते. तत्सम जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपविण्यातही आली होती; पण अद्याप ही कामे पूर्ण झाली नाही. यामुळे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले सिग्नलचे खांब धोकादायक ठरू लागले आहेत. नव्हे तर तेथे अपघातही होत आहेत. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.