शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणऱ्यां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 20:49 IST

बोर जलाशयातील पाणी ओलितासाठी सोडण्यात आले एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कमी पाण्यात ओलितासाठी शेतकऱ्यांनी इंजिनचा वापर करण्याचा प्रयत्न करताच त्या शेतकऱ्यांना इंजिन जप्तीचा धाक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : धरणातून सोडलेले पाणी पंपाने उचलण्याची परवानगी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : बोर जलाशयातील पाणी ओलितासाठी सोडण्यात आले एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कमी पाण्यात ओलितासाठी शेतकऱ्यांनी इंजिनचा वापर करण्याचा प्रयत्न करताच त्या शेतकऱ्यांना इंजिन जप्तीचा धाक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.पाटचऱ्या व वितरिकांची नावा पुरुती साफसफाई करून गत १० दिवसाअगोदर बोर वितरिकेला बोर जलायशातून पाणी सोडण्यात आले. मोई गावानजीक असलेल्या बीबीच्या टेकडीजवळ मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. हळूहळू पाणी पुढे सरकू लागले. आधीच शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीत चणा पेरणीला प्राधान्य दिले. यास पिकाला तुषार सिंचनाने पाणी देण्याची आवश्यकता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कॅनलवर डिझेल इंजिन लावून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाण्याचा कमी प्रमाणात वापर होईल. लवकर ओलित करता येईल व पाण्याचा अपव्ययही होणार नाही, अशी मानसिकता यामागे शेतकऱ्यांची होती. पण याच शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व कंत्राटी मजुराकडून इंजिनद्वारे पाणी ओलण्यास मनाई करून इंजिन जप्तीची व पोलिसांचा धाक दाखवून इंजिन काढण्यास बाध्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना गळ घातली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र ओलितासाठी रात्रीचा दिवस शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाविरोधात रोष वाढला आहे.इंजिन लावण्यास मनाई केली नसल्याचा दावासेलू उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता असे काहीही नाही, तशी इंजिनाद्वारे पाणी ओलण्यास मनाई केली नाही, असे सांगितले तर शाखा अभियंता राऊत यांनी पाणी कमी आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचणे हा उद्देश आहे. एक दोन दिवसानंतर इंजिनद्वारे पाणी ओलणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणार असल्याचे सांगितलेयावरुन आगामी पाणी टंचाईचे संकेत मिळत असल्याने लवकरात लवकर यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. या सर्व कार्यप्रणालीमुळे रोष वाढत चालला आहे.नादुरूस्त पाटचऱ्यांबोर वितरिका, पाटचऱ्याची दुरावस्था पाहता शेताच्या बांधापर्यंत पाणी नेताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय उघड्या डोळ्यांनी पाहावा लागत आहे हे विशेष.रोजंदारी कर्मचाऱ्यांची दादागिरीअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने काही रोजंदारी कर्मचारी कामावर घेतले आहे. या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न होत आहे तर नव्याने निवडण्यात आलेल्या पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नाममात्र ठेवण्यात आले आहे.वितरीकांची साफसफाई रखडलीबोर जलाशयात पाणीसाठा कमी असला तरी बोरधरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. वितरिकांची साफसफाई करण्यात येत असली तरी ती नावालाच असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. मागील ५० वर्षांपासून याच वितरिकेद्वारे धरणाचे पाणी सोडण्यात येते. त्या वितरीका दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असताना रबी हंगामाच्या वेळी जेसीबी लावून काही ठिकाणी थातूर मातूर काम झाले. पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचे या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. वितरिका काही ठिकाणी झुडपांनी वेढले आहे. शेतकऱ्यांना पाणी शेतात आणण्यासाठी प्रचंड मेहनत खर्च करावा लागतो. ज्या ठिकाणी वितरिका पाझरत आहे.बोर नदीला पाणी कमी, पिके धोक्यातसेवाग्राम - हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सिंचन व्यवस्थेची महत्वाची भूमिका राहिली आहे.यात नदी काठावरील गावातील शेतकºयांनी यशाची किमया सिंचनातून साधली आहे.पण आता नदीचे पाणीच आटायला लागल्याने शेतकरी चिंतीत आहे..खडका,कोपरा,चानकी,देऊळगाव,पिंपळगाव पुढे आष्टा पर्यंत बोर नदी गेलेली आहे.या नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकून शेतात सिंचनाची सोय केली आहे.या मुळे शेतकरी ऊसासह रब्बीत चना व गव्हाचे पिके घ्यायला लागलेले आहे.या पाण्यामुळे तूर व कपाशीला पण फायदा होत होता. या वर्षी पाऊसच कमी झाल्याने जल संकट निर्माण झाले.धरणात जलसाठा कमी असल्याने नदीत पाणी येणार की नाही हा प्रश्न शेतकºयांना सतावित असल्याचे दिसून येते. सेवाग्राम ते हमदापूर या दरम्यान महाकाली तर शिवनगर,जुनोना ते भोसा,आष्टापर्यंत बोरधरणाचे पाणी कालव्यातून सोडल्या जाते.महाकाली धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे बोरधरणाची परिस्थिती काही वेगळी नाही. कालव्यातून लिकेज पाणी बोर नदी आणि हमदापूर नाल्यात येत असल्याने ओलितासाठी शेतकºयांना फायदा होत असते. यामुळे तीन पिके शेतकरी नक्कीच घेत असतात. खडका,कोपरा व चानकी या शिवारात ३५ ते ४० मोटर पंप नदीवर आहे.कोपरा शिवारातील लोकांनी नदीला पाणीच कमी असल्याने अजूनही चना वा गव्हासाठी कठाण तयार केले नसल्याचे सुलोचना खेरडे या महिलेने सांगितले. पिंपळगाव येथील पुरूषोत्तम नागतोडे यांनी पण पाण्याबाबतची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. बोर नदी आटण्याच्या स्थितीत असून विहिरीत पाणी कमी आहे.नदीच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी अवलंबून आहे.यात पाणी समस्येमुळे ऊस पिक धोक्यात आलेले आहे. गव्हाचा पेरा कमीच राहणार असून चना शेतकरी पेरणार अशी स्थिती आहे. पिंपळगावला बंधारा आहे.तो पाण्यासाठी शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या फळ्यांना छिद्र पाडल्याने पाणी वाहून गेले आता भिस्त आहे ती धरणाच्या पाण्यावर अशी माहिती पुरूषोतम नागतोडे यांनी दिली.तर चानकीचे सरपंच पंढरीनाथ राऊत यांनी पण शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी वापर करावा, असे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई