शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पाणी बदलाने डायरियाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: July 8, 2017 00:05 IST

पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र

पाणी उकळून पिण्याचा सल्ला : खासगीसह प्राथमिक आरोग्य केंद्र फुल्ल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयातही गर्दी आहे. यात चिमुकल्यांची संख्या अधिक असून काही ज्येष्ठांचाही समावेश आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच जागरूक होत आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्यामुळे उद्भवत असलेल्या या आजारावर आळा बसविण्याकरिता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नळांना अथवा विहिरींना आलेले पाणी उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक प्रभाव चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे अनेकांना व्हायरल फिवरनेही ग्रासल्याचे दिसून आले आहे. व्हायरल फिवरची लागण झाल्यास पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळावे. एकापासून इतर बालकांना फिवरची लागण होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. दूषित पाणी पिल्याने डायरीया होत असल्याचे शास्त्रीय कारण आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात होणारा पाणी पुरवठा हा नियमानुसार शुद्धीकरण करून होतोच असे नाही. होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत जिल्ह्यात शुद्धीकरणाची सुविधा तोकडी असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात कालबाह्य झालेल्या शुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत आहे. यातच पालिकेच्या नळाचे पाईप फुटून त्यातूनही दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. जलरक्षकांची जबाबदारी वाढली शहरात अथवा गावात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविण्यात आली आहे. शहरात नगर परिषद आणि गावात ग्रामपंचायतीची नळयोजना आहे. या योजनेतून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. होणारा पाणी पुरवठा शुद्ध आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे काम जलरक्षकांचे आहे. त्यांच्याकडून पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने होत असलेला पाणी पुरवठा तपासून त्याची माहिती संबंधितांना देत त्यावर उपाययोजना आखण्याच्या सूचना करणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर टाकावे गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अथवा इतर स्त्रोतात ग्रामपंचायतीने ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतूकीकरण करणे गरजेचे आहे. ब्लिचिंग पावडर खरेदीचे अधिकारी ग्रामपंचातींना मिळाले असल्याने त्यांच्याकडून गावाच्या आरोग्याच्या सुरक्षेकरिता हा निर्णय स्वत: घेणे गरजेचे झाले आहे. पाण्याच्या बदलामुळे डायरीयाची लागण होते. यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व ओषधांचा साठा पोहोचविण्यात आला आहे. नागरिकांनी घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णालयात जावे. - डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा आर्रोग्य अधिकारी. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यात होत असलेल्या बदलामुळे डायरीयाची लागण होत असल्याचे वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. पाण्याच्या बदलाचा विशेष परिणाम चिमुकल्यांवर होत आहे. यामुळे पालकांनी पाणी उकळून आणि गरम करून प्यावे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिवरचे रुग्णही वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालकांनी तापाची लागण होताच मुलाला शाळेत पाठवू नये. अशा बालकांमुळे इतरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात डायरीयाची लागण झालेले रुग्ण उपचार घेत आहे. पाण्याच्या बदलामुळे हा आजार होतो. शिवाय नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळत पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिणे गरजेचे आहे. - डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक .