शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बदलाने डायरियाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: July 8, 2017 00:05 IST

पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र

पाणी उकळून पिण्याचा सल्ला : खासगीसह प्राथमिक आरोग्य केंद्र फुल्ल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयातही गर्दी आहे. यात चिमुकल्यांची संख्या अधिक असून काही ज्येष्ठांचाही समावेश आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच जागरूक होत आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्यामुळे उद्भवत असलेल्या या आजारावर आळा बसविण्याकरिता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नळांना अथवा विहिरींना आलेले पाणी उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक प्रभाव चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे अनेकांना व्हायरल फिवरनेही ग्रासल्याचे दिसून आले आहे. व्हायरल फिवरची लागण झाल्यास पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळावे. एकापासून इतर बालकांना फिवरची लागण होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. दूषित पाणी पिल्याने डायरीया होत असल्याचे शास्त्रीय कारण आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात होणारा पाणी पुरवठा हा नियमानुसार शुद्धीकरण करून होतोच असे नाही. होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत जिल्ह्यात शुद्धीकरणाची सुविधा तोकडी असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात कालबाह्य झालेल्या शुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत आहे. यातच पालिकेच्या नळाचे पाईप फुटून त्यातूनही दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. जलरक्षकांची जबाबदारी वाढली शहरात अथवा गावात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविण्यात आली आहे. शहरात नगर परिषद आणि गावात ग्रामपंचायतीची नळयोजना आहे. या योजनेतून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. होणारा पाणी पुरवठा शुद्ध आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे काम जलरक्षकांचे आहे. त्यांच्याकडून पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने होत असलेला पाणी पुरवठा तपासून त्याची माहिती संबंधितांना देत त्यावर उपाययोजना आखण्याच्या सूचना करणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर टाकावे गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अथवा इतर स्त्रोतात ग्रामपंचायतीने ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतूकीकरण करणे गरजेचे आहे. ब्लिचिंग पावडर खरेदीचे अधिकारी ग्रामपंचातींना मिळाले असल्याने त्यांच्याकडून गावाच्या आरोग्याच्या सुरक्षेकरिता हा निर्णय स्वत: घेणे गरजेचे झाले आहे. पाण्याच्या बदलामुळे डायरीयाची लागण होते. यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व ओषधांचा साठा पोहोचविण्यात आला आहे. नागरिकांनी घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णालयात जावे. - डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा आर्रोग्य अधिकारी. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यात होत असलेल्या बदलामुळे डायरीयाची लागण होत असल्याचे वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. पाण्याच्या बदलाचा विशेष परिणाम चिमुकल्यांवर होत आहे. यामुळे पालकांनी पाणी उकळून आणि गरम करून प्यावे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिवरचे रुग्णही वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालकांनी तापाची लागण होताच मुलाला शाळेत पाठवू नये. अशा बालकांमुळे इतरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात डायरीयाची लागण झालेले रुग्ण उपचार घेत आहे. पाण्याच्या बदलामुळे हा आजार होतो. शिवाय नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळत पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिणे गरजेचे आहे. - डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक .