शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

धोची घाट रद्दची फाईल पेंडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:41 IST

समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची कारवाई झाली नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचा कारवाईत भेदभाव : वाळू उपशाला मूकसंमती?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची कारवाई झाली नाही. आता घटनेला महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही आदेशाची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातच पेंडींग आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईत असा भेदभाव करण्याचे कारण तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पहिल्या टप्प्यात दहा घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यातील आठ घाटांचा लिलाव झाला असून त्यामध्ये आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव)-२, पारडी (नगाजी), धोची व समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव या वाळू घाटांचा समावेश आहे.यापैकी ईस्माईलपूर व धोची घाट वगळता सर्व घाटांची मुदत जूलै महिन्यातच संपली. यातील इस्माईलपूर घाटाचा ताबा उशिरा घेण्यात आल्याने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत तर धोची घाट आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने सर्वाधिक २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयाच्या ऐतिहासिक बोलीत घेतल्याने या घाटाधारकाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, धोची घाटासह शिवणी-१ घाट हा माफीयागिरीमुळे मुदत संपण्यापूर्वीच कारवाईच्या कचाट्यात सापडला. शिवणी घाटात संतोष नवरंगे नामक वाळू माफियाने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर पिस्टल रोखल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत आठ दिवसाच्या आत हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत झाला. पण, धोची घाट रद्द करण्याच्या आदेशाला ग्रहण लागले आहे.घाटधारकाने हा घाट अक्षय बुरांडे व त्याच्या सहकाऱ्यांना उपसा करण्यासाठी दिला होता. ते गावातून जड वाहतूक करीत असल्याने १६ जुलै रोजी गावकऱ्यांनी त्यांना गावातून वाहतूक करण्यासाठी मनाई केली. तेव्हा बुरांडे याने गावकऱ्यांशी वाद घालत चाकू हल्ला केला. यात ज्ञानेश्वर इंगळे गंभीर जखमी झाले. तक्रारीवरुन वडनेर पोलिसांनी आरोपीला अटकही केली. त्यानंतर हा वाळू घाट रद्द करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही घाट रद्द करण्याचा आदेश पारीत झाला नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत घाटधारकाला प्रशासनाकडून वाळू उपस्याची मूक संमती तर दिली जात नाही ना? असाही प्रश्न आता चर्चीला जात आहे.तहसिलदार म्हणतात घाट रद्दची कारवाई झालीधोची घाटावरील कारवाई संदर्भात हिंगणघाटचे तहसीलदार मुंधडा यांना विचारले असता त्यांनी घाटातून उपसा बंद आहे. तसेच घाट रद्दचा आदेशही पारीत झाल्याचे सांगितले. इतकेच नाही तर आदेशाची प्रतही असल्याचेही ते म्हणाले. परंतू प्रत मागितली असता काही वेळाने त्यांनी आदेशच झाला नाही, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविला. आता ती फाईल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, असा शब्द फिरविला. यावरुन या कारवाईत नक्कीच गोडबंगाल असल्याचे लक्षात येते.

टॅग्स :sandवाळू