शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

धोची घाट रद्दची फाईल पेंडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:41 IST

समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची कारवाई झाली नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचा कारवाईत भेदभाव : वाळू उपशाला मूकसंमती?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची कारवाई झाली नाही. आता घटनेला महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही आदेशाची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातच पेंडींग आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईत असा भेदभाव करण्याचे कारण तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पहिल्या टप्प्यात दहा घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यातील आठ घाटांचा लिलाव झाला असून त्यामध्ये आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव)-२, पारडी (नगाजी), धोची व समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव या वाळू घाटांचा समावेश आहे.यापैकी ईस्माईलपूर व धोची घाट वगळता सर्व घाटांची मुदत जूलै महिन्यातच संपली. यातील इस्माईलपूर घाटाचा ताबा उशिरा घेण्यात आल्याने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत तर धोची घाट आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने सर्वाधिक २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयाच्या ऐतिहासिक बोलीत घेतल्याने या घाटाधारकाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, धोची घाटासह शिवणी-१ घाट हा माफीयागिरीमुळे मुदत संपण्यापूर्वीच कारवाईच्या कचाट्यात सापडला. शिवणी घाटात संतोष नवरंगे नामक वाळू माफियाने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर पिस्टल रोखल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत आठ दिवसाच्या आत हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत झाला. पण, धोची घाट रद्द करण्याच्या आदेशाला ग्रहण लागले आहे.घाटधारकाने हा घाट अक्षय बुरांडे व त्याच्या सहकाऱ्यांना उपसा करण्यासाठी दिला होता. ते गावातून जड वाहतूक करीत असल्याने १६ जुलै रोजी गावकऱ्यांनी त्यांना गावातून वाहतूक करण्यासाठी मनाई केली. तेव्हा बुरांडे याने गावकऱ्यांशी वाद घालत चाकू हल्ला केला. यात ज्ञानेश्वर इंगळे गंभीर जखमी झाले. तक्रारीवरुन वडनेर पोलिसांनी आरोपीला अटकही केली. त्यानंतर हा वाळू घाट रद्द करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही घाट रद्द करण्याचा आदेश पारीत झाला नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत घाटधारकाला प्रशासनाकडून वाळू उपस्याची मूक संमती तर दिली जात नाही ना? असाही प्रश्न आता चर्चीला जात आहे.तहसिलदार म्हणतात घाट रद्दची कारवाई झालीधोची घाटावरील कारवाई संदर्भात हिंगणघाटचे तहसीलदार मुंधडा यांना विचारले असता त्यांनी घाटातून उपसा बंद आहे. तसेच घाट रद्दचा आदेशही पारीत झाल्याचे सांगितले. इतकेच नाही तर आदेशाची प्रतही असल्याचेही ते म्हणाले. परंतू प्रत मागितली असता काही वेळाने त्यांनी आदेशच झाला नाही, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविला. आता ती फाईल अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, असा शब्द फिरविला. यावरुन या कारवाईत नक्कीच गोडबंगाल असल्याचे लक्षात येते.

टॅग्स :sandवाळू