शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

धनगर समाजाला विद्यापीठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:33 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही.

ठळक मुद्देमनोहर धोंडे : सोलापूर विद्यापीठाला ‘शिवयोगी श्री सिद्धेश्वर’ नाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. आरक्षणाचे आश्वासन विसरून धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली होती. धनगर समाजाला विद्यापिठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे आहे. शिवाय आता सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे धरणे देणार असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. धोंडे पुढे म्हणाले, आपण सध्या पाच दिवसीय विदर्भाच्या दौºयावर आहे. हा दौरा आंदोलनाची पूर्व तयारीचा एक भाग आहे. संघटनेच्या देशात ५ हजार शाखा असून श्रीलंका व लंडन येथेही शाखा आहेत. आरक्षणाची पहिली चळवळ २००५ पासून सुरू केली. सोलापूर विद्यापिठाचा शिवयोगी श्री सिद्धेश्वर असा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली. त्या अनुषंगाने आम्ही संबंधितांना निवेदनेही दिली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्याची घोषणा केली. सदर घोषणचे एक अपवाद वगळता कुठेही स्वागत झाले नाही;पण या घोषणेनंतर २४ ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. तर २० ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा दहन करून दिला नाही. शिवाय पाच ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज हा आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, राजकीय पोळी शेकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर विद्यापीठ असे नाव देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी येत्या १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटनेचे विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार असून राज्याचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य मागे घेत झालेल्या चुकीची दुरूस्ती करावी. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असेही यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अभय कल्लावार, उध्वराव गाडेकर, सुरेश पट्टेवार आदींची उपस्थिती होती.