शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धनगर समाजाला विद्यापीठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:33 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही.

ठळक मुद्देमनोहर धोंडे : सोलापूर विद्यापीठाला ‘शिवयोगी श्री सिद्धेश्वर’ नाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. आरक्षणाचे आश्वासन विसरून धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली होती. धनगर समाजाला विद्यापिठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे आहे. शिवाय आता सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे धरणे देणार असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. धोंडे पुढे म्हणाले, आपण सध्या पाच दिवसीय विदर्भाच्या दौºयावर आहे. हा दौरा आंदोलनाची पूर्व तयारीचा एक भाग आहे. संघटनेच्या देशात ५ हजार शाखा असून श्रीलंका व लंडन येथेही शाखा आहेत. आरक्षणाची पहिली चळवळ २००५ पासून सुरू केली. सोलापूर विद्यापिठाचा शिवयोगी श्री सिद्धेश्वर असा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली. त्या अनुषंगाने आम्ही संबंधितांना निवेदनेही दिली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्याची घोषणा केली. सदर घोषणचे एक अपवाद वगळता कुठेही स्वागत झाले नाही;पण या घोषणेनंतर २४ ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. तर २० ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा दहन करून दिला नाही. शिवाय पाच ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज हा आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, राजकीय पोळी शेकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर विद्यापीठ असे नाव देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी येत्या १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटनेचे विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार असून राज्याचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य मागे घेत झालेल्या चुकीची दुरूस्ती करावी. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असेही यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अभय कल्लावार, उध्वराव गाडेकर, सुरेश पट्टेवार आदींची उपस्थिती होती.