शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गावांच्या विकासाकरिता ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:37 IST

जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते.

ठळक मुद्देराज्यातील पहिला महत्त्वाकांक्षी उपक्रम : कारंजा पं.स.पासून आज होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते. परिणामी ग्रामीण जनतेमधून नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे पंचायत समितीवरील अधिकारी, पदाधिकारी आणि नागरीक यांच्यामध्ये समन्वय घडवून विकास साधण्याकरिता आता जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाची सुरुवात उद्या १२ आॅक्टोबर रोजी कारंजा पंचायत समितीतून होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमार्फत ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शासनाव्दारे पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील तळागाळातील लोकांच्या विकासाच्या विविध योजनांची माहिती देणे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये जनतेला योग्य तो न्याय व विकास विषयक कामे पूर्णत्वास नेण्याकरिता येणाºया अडचणींचे निराकरण करणे तसेच नियोजनाअभावी विकास कामे पुर्णत्वास जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये व्यक्त होणारी नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे समाधान करणे. पंचायत समिती स्तरावर पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून विकास कामांना गती देत असताना त्यावर उपाययोजना सूचविणे. गाव पातळीवर काम करीत असताना सरपंच व ग्रामसेवक यांना येणाºया अडचणी जाणून घेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पत्रकातून कळविण्यात आले आहे.जिल्हा परिषदेतील समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे.नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा