शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गावांच्या विकासाकरिता ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:37 IST

जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते.

ठळक मुद्देराज्यातील पहिला महत्त्वाकांक्षी उपक्रम : कारंजा पं.स.पासून आज होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते. परिणामी ग्रामीण जनतेमधून नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे पंचायत समितीवरील अधिकारी, पदाधिकारी आणि नागरीक यांच्यामध्ये समन्वय घडवून विकास साधण्याकरिता आता जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाची सुरुवात उद्या १२ आॅक्टोबर रोजी कारंजा पंचायत समितीतून होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमार्फत ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शासनाव्दारे पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील तळागाळातील लोकांच्या विकासाच्या विविध योजनांची माहिती देणे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये जनतेला योग्य तो न्याय व विकास विषयक कामे पूर्णत्वास नेण्याकरिता येणाºया अडचणींचे निराकरण करणे तसेच नियोजनाअभावी विकास कामे पुर्णत्वास जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये व्यक्त होणारी नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे समाधान करणे. पंचायत समिती स्तरावर पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून विकास कामांना गती देत असताना त्यावर उपाययोजना सूचविणे. गाव पातळीवर काम करीत असताना सरपंच व ग्रामसेवक यांना येणाºया अडचणी जाणून घेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पत्रकातून कळविण्यात आले आहे.जिल्हा परिषदेतील समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे.नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा