शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या विकासाकरिता ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:37 IST

जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते.

ठळक मुद्देराज्यातील पहिला महत्त्वाकांक्षी उपक्रम : कारंजा पं.स.पासून आज होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला खिळ बसते. परिणामी ग्रामीण जनतेमधून नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे पंचायत समितीवरील अधिकारी, पदाधिकारी आणि नागरीक यांच्यामध्ये समन्वय घडवून विकास साधण्याकरिता आता जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाची सुरुवात उद्या १२ आॅक्टोबर रोजी कारंजा पंचायत समितीतून होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमार्फत ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शासनाव्दारे पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील तळागाळातील लोकांच्या विकासाच्या विविध योजनांची माहिती देणे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये जनतेला योग्य तो न्याय व विकास विषयक कामे पूर्णत्वास नेण्याकरिता येणाºया अडचणींचे निराकरण करणे तसेच नियोजनाअभावी विकास कामे पुर्णत्वास जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये व्यक्त होणारी नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे समाधान करणे. पंचायत समिती स्तरावर पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून विकास कामांना गती देत असताना त्यावर उपाययोजना सूचविणे. गाव पातळीवर काम करीत असताना सरपंच व ग्रामसेवक यांना येणाºया अडचणी जाणून घेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पत्रकातून कळविण्यात आले आहे.जिल्हा परिषदेतील समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे.नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा