शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

अंतर्गत वादाचा विकास कामांना फटका

By admin | Updated: October 9, 2016 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षाशी बंडखोरी करीत श्याम कार्लेकर यांनी सभापतिपद बळकावले.

वर्धा बाजार समितीतील प्रकार : विरोधाचे राजकारण होण्याची चर्चावर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षाशी बंडखोरी करीत श्याम कार्लेकर यांनी सभापतिपद बळकावले. यातून अंतर्गत वाद उफाळल्याने त्यांच्यावर अविश्वास आला; मात्र तो बारगळला. अंतर्गत असलेल्या या वादाचा फटका समितीत होणाऱ्या विकास कामांना बसणार अशी चर्चा आहे. ज्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात वर केला होता ते सभातींकडून होत असलेल्या विकास कामांना हात देतील काय, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. अविश्वास प्रस्तावाच्या वाऱ्याने वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची जिल्ह्यात चर्चीली जात आहे. यात पहिले माजी सभापती शरद देशमुख व नंतर सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास आला. यातील देशमुख यांच्यावरील प्रस्ताव पारित झाला तर कार्लेकर यांच्यावरील प्रस्ताव बारगळला. यामुळे आता समितीत विकास कामे करण्याचे आव्हान सभापतींना आहे. अविश्वासाच्यावेळी एकत्रित आलेले सभासद समितीच्या सभापतीला विकास कामे करताना पाठींबा देतात की त्यांना विरोध करतात याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर देणे व त्यांच्याकरिता योग्य सुविधा बाजार समितीने द्याव्या अशी बळीराजचाची माफ अपेक्षा आहे. ही अपेक्षा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीतून पूर्ण होत असल्याने ती आज विदर्भात नावलौकीक मिळवून आहे. वर्धा बाजार समितीत आतापर्यंत एकाधिकारशाही असूनही तिचा पाहिजे तसा विकास झाला नाही. याच मुद्यावर एकत्र येत सर्वच सदस्यांनी शदर देशमुख यांच्यावर अविश्वास आणला होता. त्यावेळी कुणीच नेत्याच्या दडपणात गेले नाही. मग आता विकास कामे करताना आता या सदस्यांकडून होणारा विरोध सर्वांनाच बुचाकळ्यात पाडणारा आहे.(प्रतिनिधी) अंतर्गत वादातून आला होता अविश्वासजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बाजार समितीत विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. तो पारितही झाला. अशात पक्षनिष्ठेच्या कारणावरून पुन्हा अविश्वास आला. तो बारगळला. आता विकास कामांना चालना मिळेल, असे वाटत असताना होणाऱ्या कामांना विरोध होण्याचे चित्र समितीत निर्माण झाले होते. केवळ राजकारणाच्या खेळात वर्धा बाजार समितीचे चित्र पालटण्याऐवजी ते तसेच राहणार असल्याचे संकेत येथे दिसत आहे. विकास कामावरून एकत्र आलेल्या या संचालकांनी निदान विकास कामांना विरोध टाळावा, अशी अपेक्षा येथे येत असलेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.