शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

अंतर्गत वादाचा विकास कामांना फटका

By admin | Updated: October 9, 2016 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षाशी बंडखोरी करीत श्याम कार्लेकर यांनी सभापतिपद बळकावले.

वर्धा बाजार समितीतील प्रकार : विरोधाचे राजकारण होण्याची चर्चावर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षाशी बंडखोरी करीत श्याम कार्लेकर यांनी सभापतिपद बळकावले. यातून अंतर्गत वाद उफाळल्याने त्यांच्यावर अविश्वास आला; मात्र तो बारगळला. अंतर्गत असलेल्या या वादाचा फटका समितीत होणाऱ्या विकास कामांना बसणार अशी चर्चा आहे. ज्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात वर केला होता ते सभातींकडून होत असलेल्या विकास कामांना हात देतील काय, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. अविश्वास प्रस्तावाच्या वाऱ्याने वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची जिल्ह्यात चर्चीली जात आहे. यात पहिले माजी सभापती शरद देशमुख व नंतर सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास आला. यातील देशमुख यांच्यावरील प्रस्ताव पारित झाला तर कार्लेकर यांच्यावरील प्रस्ताव बारगळला. यामुळे आता समितीत विकास कामे करण्याचे आव्हान सभापतींना आहे. अविश्वासाच्यावेळी एकत्रित आलेले सभासद समितीच्या सभापतीला विकास कामे करताना पाठींबा देतात की त्यांना विरोध करतात याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर देणे व त्यांच्याकरिता योग्य सुविधा बाजार समितीने द्याव्या अशी बळीराजचाची माफ अपेक्षा आहे. ही अपेक्षा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीतून पूर्ण होत असल्याने ती आज विदर्भात नावलौकीक मिळवून आहे. वर्धा बाजार समितीत आतापर्यंत एकाधिकारशाही असूनही तिचा पाहिजे तसा विकास झाला नाही. याच मुद्यावर एकत्र येत सर्वच सदस्यांनी शदर देशमुख यांच्यावर अविश्वास आणला होता. त्यावेळी कुणीच नेत्याच्या दडपणात गेले नाही. मग आता विकास कामे करताना आता या सदस्यांकडून होणारा विरोध सर्वांनाच बुचाकळ्यात पाडणारा आहे.(प्रतिनिधी) अंतर्गत वादातून आला होता अविश्वासजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बाजार समितीत विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. तो पारितही झाला. अशात पक्षनिष्ठेच्या कारणावरून पुन्हा अविश्वास आला. तो बारगळला. आता विकास कामांना चालना मिळेल, असे वाटत असताना होणाऱ्या कामांना विरोध होण्याचे चित्र समितीत निर्माण झाले होते. केवळ राजकारणाच्या खेळात वर्धा बाजार समितीचे चित्र पालटण्याऐवजी ते तसेच राहणार असल्याचे संकेत येथे दिसत आहे. विकास कामावरून एकत्र आलेल्या या संचालकांनी निदान विकास कामांना विरोध टाळावा, अशी अपेक्षा येथे येत असलेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.