शहरं
Join us  
Trending Stories
1
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
4
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
5
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
6
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
7
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
8
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
9
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
10
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
11
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
12
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
13
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
14
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
15
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
16
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
17
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
18
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
19
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
20
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

एमआयडीसीतील रिकाम्या भूखंडामुळे विकास खुंटला

By admin | Updated: September 30, 2016 02:24 IST

धोरणात्मक अभावामुळे येथील औद्योगिक वसाहत अनेक कारणांनी चर्चेत आहे. वसाहत परिसरातील खाली भूखंडाना रिसेलमध्ये विकण्यासाठी दलालांची साखळी कार्यरत आहे.

रिकामे भूखंड चढ्या दरात विकण्यासाठी दलालांची साखळीहरिदास ढोक  देवळीधोरणात्मक अभावामुळे येथील औद्योगिक वसाहत अनेक कारणांनी चर्चेत आहे. वसाहत परिसरातील खाली भूखंडाना रिसेलमध्ये विकण्यासाठी दलालांची साखळी कार्यरत आहे. ज्यांनी गत दोन वर्षांत खाली भूखंडात कोणताही उद्योग सुरू केला नाही, अश्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून बीसीसीचे (बिल्डींग कम्प्लेंट सर्टिफिकेट) प्रमाणपत्र दिले जात आहे. अधिकाऱ्यांसोबतच्या साटेलोट्यातून तसेच चिरीमीरीच्या व्यवहारातून हा सर्व प्रकार होत असल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये सोयीच्या लोकांनी भूखंड अडवून ठेवल्याने गरजू उद्योजकांवर अन्याय होत आहे.देवळीची औद्योगिक वसाहत ६४२ एकरात थाटण्यात आली. सन १९९४ मध्ये या वसाहतीला ‘डी’ प्लसचा दर्जा प्राप्त होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यामध्ये १०१ भूखंड पाडून यापैकी ९५ भूखंडाचे उद्योजकांना वाटप करण्यात आले. परंतु काही उद्योजकांनी फक्त नावापुरतेच भूखंड घेऊन ठेवल्याने मागील २२ वर्षापासून हे भूखंड रिकामे पडले आहे. अश्या भूखंडाची संख्या ३० च्यावर आहे. खाली भूखंडाबाबतच्या शासनाच्या बदलत्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या काहींनी मागील दोन वर्षात या भूखंडाची रिसेलमध्ये विक्री केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठरलेल्या दलालामार्फत चढ्याभावाने करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याने लाखोचे व्यवहार बिनबोभाटपणे तसेच सोयीच्या लोकांसोबत करण्यात आले. व्यवहारात दोन वर्षांचा कालावधी होवून सुद्धा या भूखंडावर कोणताही उद्योग उभारला गेला नाही. त्यामुळे हे सर्व भूखंड आजच्या घटकेला रिकामे पडले आहे. या रिकाम्या भूखंडावर उद्योगांची निर्मिती करण्यात यावी, अन्यथा कारवाई करून हे भूखंड ताब्यात घ्यावी, अशी मागणी आहे. अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यातून बीसीसीचे प्रमाणपत्र भूखंडातील कोणतीही कारवाई टाळण्यासाठी या जागेवर १५० ते २०० चौ. फुटाचे ओटे बांधून संबंधित वसाहत अधिकाऱ्यांकडून बीसीसीचे प्रमाणपत्र घेण्यात आले. वास्तविक भूखंडाच्या एकूण आराजीपैकी कमीत कमी २० टक्के पर्यंतच्या जागेत ईमारतीचे बांधकाम केल्यानंतरच बीसीसी प्रमाणपत्र देण्याचा नियम आहे; परंतु या सर्व नियमांना संबंधित अधिकाऱ्यांनी याठिकाणी मूठमाती दिली आहे. कोणताही उद्योग न लावता खाली भूखंड अडवून ठेवण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात आहे. उद्योजक दलाल व अधिकारी यांचे साटेलोटे याला कारणीभूत आहे. खाली भूखंड अडवून धरल्याने या वसाहतीला अखेरची घरघर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.