शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

नेरीवासियांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार

By admin | Updated: May 17, 2017 00:35 IST

नेरी (मिर्झापूर) हे १०५ घरांचे गाव. लोकसंख्या ४५० च्या जवळपास. गावात नव्याने ग्रामपंचायत स्थापित झाली.

वॉटर कप स्पर्धा : श्रमदानातून जलस्त्रोत केले विकसित लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : नेरी (मिर्झापूर) हे १०५ घरांचे गाव. लोकसंख्या ४५० च्या जवळपास. गावात नव्याने ग्रामपंचायत स्थापित झाली. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी या गावाने गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. स्पर्धेत गावाला पुरस्कार मिळाला नाही तरी चालेल, परंतु गाव पाणीदार करून दाखवू व दुष्काळाला पिटाळून लावू, असा ग्रामस्थांचा निर्धार आहे. गावात पाणीटंचाई असल्यामुळे उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. या स्पर्धेनिमित्त सरपंच बाळ सोनटक्के यांनी गावातील तरूण-तरूणी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सरपंच व गावातील काही मुला-मुलींना प्रशिक्षण घेतले. गाव पाणीदार करताना अनेक समस्या होत्या. या गावाजवळ शेतशिवार नव्हते. त्यामुळे बाजूच्या मौजे व शिवारात काम करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याशी संपर्क करून कामे करायचे होते. मात्र या अडचणींवर मात करुन गावातील शेतमजूर, तरूण-तरूणी श्रमदानासाठी पुढे सरसावले. वाढदिवसाचे कार्यक्रम बंधाऱ्यावर साजरा करून भेट म्हणून आलेली रक्कम पाणी फाऊंडेशनला दिली. श्रमदानाला सुरूवात झाल्यावर ग्रामस्थांसोबत वर्धा, आर्वी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी संवाद साधला. नेरी मिर्झापूर गाव पाणीदार व्हावे याकरिता पुढे आल्या. यात इंडियन रेडक्रॉस, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, मदत फाऊंडेशन, अंगणवाडी सेविका, बचत गट, पोलीस विभाग, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय, गांधी विद्यालय, कृषक कन्या विद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, गजानन महाराज संस्थान, कारंजा यांनी तसेच आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, डॉ. रवींद्र सोनटक्के, मदत फाऊंडेशनच्या अनिता श्यामसुंदर भुतडा, डॉ. अविनाश कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, डॉ. अरूण पावडे, डॉ. सचिन पावडे, डॉ. राणे, प्राचार्य डॉ. हरिभाऊ वेरूळकर, प्राचार्य अभय दर्भे आदींनी विहीर पुनर्भरण, वृक्ष खड्डे असे कामे ग्रामस्थांसह केले. गावकऱ्यांचा उत्साह वाढावा याकरिता सिने अभिनेते जितेंद्र जोशी यांनी भेट देवून झालेल्या कामाचे कौतुक केले.