शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

जिल्ह्यात 32.32 टक्के लसीकरण तरीही ‘डेल्टा प्लस’ची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस तुटवड्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली, तर शुक्रवारी बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू होती. आरोग्य विभागाने लसीच्या एक लाख डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन हाय अलर्टवर : पुन्हा शासनाकडून केली जातेय वर्धा जिल्ह्याची लसकोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३ लाख ७८ हजार ३९४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ३२.३२ असली तरी, कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची भीती कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोविडच्या या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडलेला नसून आरोग्यसह जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५ हजार ४१९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला, तर ७२ हजार ९७५ व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस तुटवड्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली, तर शुक्रवारी बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू होती. आरोग्य विभागाने लसीच्या एक लाख डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. पण शुक्रवारी लस साठ्याचा पुरवठा झाला नव्हता. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा प्रतिसाद लक्षात घेता शासनाकडून मुबलक लससाठा उपलब्ध होण्याची गरज आहे.  

१८ ते ४४ वयोगटातील ५० हजार व्यक्तींना व्हॅक्सिनेशन

- जिल्ह्यात आतापर्यंत कोविड लसीचे ३ लाख ७८ हजार ३९४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ५० हजार व्यक्तींचा समावेश आहे.- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, शासनाकडून अतिशय तोकडा लसीचा साठा पाठविला जात  आहे.

कारंजा तालुक्यात कमी, तर वर्धा तालुक्यात झाले सर्वाधिक व्हॅक्सिनेशन- जिल्ह्यात आतापर्यंत ३२.३२ टक्के लसीकरण झाले आहे. आठही तालुक्यांचा विचार केल्यास, वर्धा तालुक्यात सर्वाधिक, तर कारंजा (घा.) तालुक्यात सर्वात कमी व्हॅक्सिनेशन झाले आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस