शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

बहुरूपी कुटुंबीय कोरोनामुळे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

बहुरूपी समाज या भिक्षेतून काही मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवायचे. या समाजातील महिला वर्ग घरोघरी जाऊन गोधडया शिवण्याचे काम करीत असतात. भिक्षेत जगणाऱ्या या कुटुंबातील नव युवकांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत जमेल तो व्यवसाय करण्याचा मार्ग सुकर केला. बहुरूपी समाजातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर गेल्या चार ते पाच वर्षांपासुन हंगामी व्यवसायाची सुरुवात केली आहे .

ठळक मुद्देविकण्यासाठी आणलेला माल घरीच पडून : उदरनिर्वाहाचे साधन हिरावले

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : बहुरुपीचे सोंग घेऊन दारोदारी भटकणारा समाज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.बहुरूपी समाज या भिक्षेतून काही मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवायचे. या समाजातील महिला वर्ग घरोघरी जाऊन गोधडया शिवण्याचे काम करीत असतात. भिक्षेत जगणाऱ्या या कुटुंबातील नव युवकांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत जमेल तो व्यवसाय करण्याचा मार्ग सुकर केला. बहुरूपी समाजातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर गेल्या चार ते पाच वर्षांपासुन हंगामी व्यवसायाची सुरुवात केली आहे . गिरड परिसरात जवळपास या समाजाची १५० कुटुंब वास्तव्य करीत आहे . गिरड येथे १० कुटुंब राहतात . सर्व कुटुंबातील तरुण वर्ग हंगामानुसार व्यवसाय करतो. यामध्ये प्लास्टिक खुर्ची, लोखंडी रॅक, स्टडी टेबल, ड्रम, बाज, मच्छरदानी या वस्तु ग्राहकांच्या गरजेनुसार बोलवितात. प्रत्येकी कुटुंब महिन्याला ५०००० हजाराचा माल विकतोय . पहाटे ५ वाजता उठुन हे लोक आपल्या दुचाकीवर साहित्य घेऊन दररोज ५० किलोमीटरचा प्रवास करतात. या मिळकतीतून संसाराचा गाडा चालवितात. बहुरूपी बेड्याला लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता सर्व घरी लाखो रुपयांचे साहित्य पडुन आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन व्यवसायात असणारे तरूण चिंतातुर अवस्थेत दिसत आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे मोठया प्रमाणात साहित्याची मागणी वाढत असते. त्यानुसार माल बोलविला जातो. सध्या ठोक माल जेथून आणला त्या व्यापाऱ्यांचे देणेही बाकी राहिले आहे. शिवाय घर चालविण्याची चिंता सध्या त्यांना सतावित आहे. जर पावसाळा पर्यंत लॉकडाऊन सुरू राहिल तर हा सगळा माल उघड्यावर पडुन आहे तो माल खराब होईल ही पण चिंता यांना सतावत आहे . जनधन योजनेअंतर्गत काही कुटुंबाना पैसे आले काही तर काहींना आलेले नाही. प्रत्येकी ५०० रुपये आल्याने एवढया तुटपुंज्या पैशात कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा हा प्रश्न या लोकांन समोर निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन या पारधी समाजाच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.व्यवसाय ठप्प झाल्याने उपासमारीची वेळउन्हाळ्यात विक्री करण्यासाठी लाखोंचा माल आणला आहे . जवळचे पैसे यामध्ये गुंतले आहे . लॉकडाऊनमुळे एकाकी व्यवसाय ठप्प झाल्याने रोजचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाने यावर तोडगा काढावा व आमच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लावावा एवढीच आमची मागणी आहे, असे राम किसनाजी शिंदे या बहुरूपी समाजातील तरूण व्यवसायिकाने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या