शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पाच एकरात २० लाखांचे उत्पन्न घेण्याचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:18 IST

एकीकडे केळीच्या बागा नावापुरत्याच दिसत असताना पवनार येथील एका युवकाने स्वेच्छानिवृत्ती घेत शेतीत पूर्णत: लक्ष दिले.

ठळक मुद्देउन्हाळ्यात केली सात हजार टिशू केळीच्या रोपांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : एकीकडे केळीच्या बागा नावापुरत्याच दिसत असताना पवनार येथील एका युवकाने स्वेच्छानिवृत्ती घेत शेतीत पूर्णत: लक्ष दिले. भर उन्हाळ्यात त्याने पाच एकरात केळीची लागवड केली व अवघ्या दोन महिन्यांत त्यापासून उत्पन्नही मिळणार आहे. ५ लाख रुपयांचा खर्च करून २० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा बाळगणारा हा शेतकरी इतरांकरिता आदर्शच ठरणार आहे.ग्रामसेवकाची नोकरी करणाºया कुंदन वाघमारे यांनी डिसेंबर २०१५ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. पवनार-सुरगाव मार्गावर शेती घेऊन भर उन्हाळ्यात ६ मार्च रोजी पाच एकरात ७ हजार टिशू केळीच्या रोपांची लागवड केली. उन्हाळ्यात केळीची लागवड आपल्या भागात करणारा कदाचित हा पहिलाच शेतकरी असावा. ठिबक सिंचनाच्या साह्याने बैलजोडीचा वापर न करता शेती करण्याचा चंग बांधला. मार्च महिन्यात लागवड आणि आगस्ट महिन्यात फळधारणा झाली. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात केळी विक्रीस बाजारात जाण्यायोग्य झाली असून फेबु्रवारी महिन्यात संपूर्ण बगीचा खाली होण्याची शक्यता आहे. दीड वर्षाचे असलेले केळीचे पीक ११ महिन्यांत मिळणार आहे. एक हजार रुपये क्विंटल भाव धरल्यास सरासरी ३५ किलो याप्रमाणे प्रती केळीच्या झाडापासून ३५० रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. यामुळे पाच एकरातील केळीपासून ५ लाख रुपयांच्या खर्चात २२ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या केळीच्या बगीच्याला अधिकाºयांसह शेतकºयांनी भेटी दिल्या. हा प्रयोग यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. यामुळे येत्या काळात केळीच्या बागा वाढण्याची शक्यता आहे.कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येते. केळीच्या बागा नामशेष होत असताना एका वर्षात कमी खर्चात अधिक उत्पन्न केळीपासून घेता येऊ शकते, हे आता सिद्ध झाले आहे. शेतकºयांनी पुन्हा केळी पिकाकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.- कुंदन वाघमारे, शेतकरी, पवनार.