शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

कडूलिंबावर वाळवीचे संकट

By admin | Updated: February 5, 2016 01:43 IST

पर्यावरण शुद्ध करणाऱ्या आणि प्राणवायू देणाऱ्या कडूलिंबाच्या झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाले आहे.

झाडे वाळताहेत : उपाययोजना गरजेच्यासेवाग्राम : पर्यावरण शुद्ध करणाऱ्या आणि प्राणवायू देणाऱ्या कडूलिंबाच्या झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात झाडे वाळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. संबंधितांनी याकडे लक्ष देत ही झाडे वाचविणे गरजेचे झाले आहे.सेवाग्राम ते वर्धा व सेवाग्राम-हमदापूर या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कडूलिंबाची झाडे आहेत. या झाडांना सध्या वाळवीने ग्रासल्याचे दिसून येते. बुध्यांपासूनच वाळवीने आक्रमण केले असून ती सुमारे सात ते आठ फुटापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. गत अनेक दशकांपासून ही झाडे वाटसरूंसाठी आश्रयस्थान होती. उन्ह, वारा, पावसापासून या झाडांनी संरक्षण दिले. शासन वा अन्य कुणी ही झाडे लावली असली तरी त्याचा लाभ अनेक अर्थाने नागरिकांना होत आहे. कडूलिंब अस्सल देशी असून आयुर्वेदात त्याची गणती व महत्त्व आहे. पारंपरिक पद्धतीने उपचार, सण, आरोग्य यात पाला, साल, काड्या, निंबोळ्या आदींचा उपयोग केला जातो. पर्यावरणाला व मानवासाठी उपयुक्त असे हे झाड असून मानवाच्या हव्यासापोटी नामशेष होत आहे. या झाडांची लागवडही होताना दिसत नाही. हे संकट कडूलिंबासाठी धोक्याचे ठरत असून संबंधितांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)