शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची केली पाहणी; पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचं आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 12:54 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागपूरराज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात आठवडाभरापासून सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. पुरामुळे  शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १९) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील वना नदी किनाऱ्यावरील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हिंगणघाट शहरातील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला पूरग्रस्त भागाची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. हिंगणघाट येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची शहरातील जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. फडणवीस यांनी याठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला. पावसाचा पूर आणि चिखल यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही या भागाची पाहणी केली असून जितकी जास्त मदत करता येईत तितकी मदत करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

जोरदार पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली आहेत, अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून नागरिक पुराच्या पाण्यात अटकून पडले आहेत. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत. जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू करत नाही तोपर्यंत बचावकार्य सुरु राहणार, असेही त्यांनी सांगितलं. 

दुबार पेरणीसुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या समावेत आमदार समीर कुणावर, खासदार रामदास तडस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार राजू तिमांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरRainपाऊसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhinganghat-acहिंगणघाटwardha-acवर्धा