शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देवळी व आर्वीत गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:24 IST

विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा

आॅनलाईन लोकमतवर्धा : विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला. तर दुपारी देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव) तर आर्वी तालुक्यातील विरूळ, रसुलाबाद, रोहणा येथे गारपीट झाली. गारपीट वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले. तर वर्धा व खरांगणा परिसरात मुसळधार पाऊस आला.नाचणगाव येथे गारपीटांमुळे शेती पांढरी झाल्याचे दिसून येते आहे. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन आल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. कालपर्यंत पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात असताना आज झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुरता अडवणीत सापडला आहे. आज पहाटेच्या सुमारास आलेला पाऊस आणि गारपीटीमुळे शेतातील उभा गहू झोपला. गारींच्या माऱ्याने चण्याच्या घाट्या फुटल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे अवकाळी पावसाचा या कापूस उत्पादकांनाही फटका बसला.आपटी परिसरात नागरिकांच्या घरासमोर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या भागात आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या गारपीटीमुळे रस्ते पांढरे झाले होते. तर पुलगावात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात २० हजार ४९९ हेक्टर वर गहू तर ४०,२३६ हेक्टरवर चणा पिकाची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या सुचना प्राप्त होताच कृषी विभाग झालेल्या नुकसानीची आकडेवारी गोळा करण्यासाठी लागले आहे.४५८ गावांतील बत्ती झाली होती गुलया वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ फिडरवरील वीज पुरवठ्यात बिघाड आला होता. यामुळे जिल्ह्यातील ४५८ गावांतील बत्ती गुल झाली होती. यात विरूळ, पुलगावसह इतर भागातील बत्तीही गुल झाली होती. या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. तर सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी सध्या २२ गावातील अडचण शोधण्याचे काम वीज वितरणकडून सुरू आहे. ही दुरूस्ती होण्याकरिता आणखी किती काळ लागेल, हे सांगणे कठीण आहे.माहिती घेण्याकरिता सर्वेक्षण करण्याच्या सूचनाअवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतांना बराच फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. यात शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याकरिता सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. ही माहिती देण्यात देवळी तालुका पहिला ठरला असून येथे ५०५ हेक्टरमधील गहू तर ६३ हेक्टरमधील चणा पिकांचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.आणखी दोन दिवस धोकाजिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर असलेले साहित्य झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.