शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देवळी व आर्वीत गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:24 IST

विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा

आॅनलाईन लोकमतवर्धा : विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला. तर दुपारी देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव) तर आर्वी तालुक्यातील विरूळ, रसुलाबाद, रोहणा येथे गारपीट झाली. गारपीट वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले. तर वर्धा व खरांगणा परिसरात मुसळधार पाऊस आला.नाचणगाव येथे गारपीटांमुळे शेती पांढरी झाल्याचे दिसून येते आहे. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन आल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. कालपर्यंत पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात असताना आज झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुरता अडवणीत सापडला आहे. आज पहाटेच्या सुमारास आलेला पाऊस आणि गारपीटीमुळे शेतातील उभा गहू झोपला. गारींच्या माऱ्याने चण्याच्या घाट्या फुटल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे अवकाळी पावसाचा या कापूस उत्पादकांनाही फटका बसला.आपटी परिसरात नागरिकांच्या घरासमोर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या भागात आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या गारपीटीमुळे रस्ते पांढरे झाले होते. तर पुलगावात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात २० हजार ४९९ हेक्टर वर गहू तर ४०,२३६ हेक्टरवर चणा पिकाची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या सुचना प्राप्त होताच कृषी विभाग झालेल्या नुकसानीची आकडेवारी गोळा करण्यासाठी लागले आहे.४५८ गावांतील बत्ती झाली होती गुलया वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ फिडरवरील वीज पुरवठ्यात बिघाड आला होता. यामुळे जिल्ह्यातील ४५८ गावांतील बत्ती गुल झाली होती. यात विरूळ, पुलगावसह इतर भागातील बत्तीही गुल झाली होती. या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. तर सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी सध्या २२ गावातील अडचण शोधण्याचे काम वीज वितरणकडून सुरू आहे. ही दुरूस्ती होण्याकरिता आणखी किती काळ लागेल, हे सांगणे कठीण आहे.माहिती घेण्याकरिता सर्वेक्षण करण्याच्या सूचनाअवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतांना बराच फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. यात शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याकरिता सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. ही माहिती देण्यात देवळी तालुका पहिला ठरला असून येथे ५०५ हेक्टरमधील गहू तर ६३ हेक्टरमधील चणा पिकांचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.आणखी दोन दिवस धोकाजिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर असलेले साहित्य झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.