शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या सिमेंटीकरणावर सदोषतेचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:55 IST

शहीदभूमी तालुक्याची निर्मिती होण्याच्या दोन वर्षापूर्वी सप्टेंबर १९८० मध्ये तळेगाव-आष्टी- साहूर या मार्गाला राज्यमार्ग २४४ म्हणून शासनाने मंजुरी दिली. तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. यासोबतच या मार्गाच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरणाच्याही कामाला गती देण्यात आली.

ठळक मुद्देतीन तपानंतर उजाडले भाग्य : बांधकामात मातीमिश्रित भुकटीचा वापर; नागरिकांमध्ये रोष

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शहीदभूमी तालुक्याची निर्मिती होण्याच्या दोन वर्षापूर्वी सप्टेंबर १९८० मध्ये तळेगाव-आष्टी- साहूर या मार्गाला राज्यमार्ग २४४ म्हणून शासनाने मंजुरी दिली. तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. यासोबतच या मार्गाच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरणाच्याही कामाला गती देण्यात आली. दीडशे कोटी रुपये खर्र्चुन बाधण्यात येत असलेल्या या रस्त्याच्या बांधकाम मातीमिश्रीत भुकटीचा वापर करण्यासोबतच अनेक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.या राष्टीय महामार्गाचा कंत्राट आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील आर. आर. कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाला आहे. या ४० किलो मीटरच्या कामाकरिता १५० कोटी रुपये मंजूर झाले आहे. आॅक्टोबर २०१८ पासून कामाला सुरुवात करुन प्रारंभी रस्त्याच्या दुतर्फा असलेली डौलदार वृक्ष अत्यल्प भावा आडवी केली. त्यानंतर मातीकामाला सुरुवात करुन याच रस्त्याच्या तळभागातील माती काढून ती मुळ रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली. हार्ड मुरुम टाकण्याऐवजी सॉफ्ट मुरुम टाकण्यात आला. त्यातही मुरुम अस्तरीकरणाची जाडीही खूपच कमी आहे. काम करताना कंत्राटदाराने जीएसबीचे ग्रेड १, ग्रेड २ न करता गिट्टी आथरून त्यावर भुकटी टाकण्यात आली. या मार्गावरील जुने सर्व पूल नामशेष करुन नवीन पुलाचे बांधकाम करताना सिमेंट काँक्रिटमध्ये नाममात्र वाळूचा वापर करण्यात आला. रस्त्यावर मुरुमाची दगडी भुकटी तयार करुन सर्रास वापर केल्या जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना या कामांवर पाणी मारण्याची गरज असताना पाण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. उभारण्यात आलेल्या प्लान्टवरही रेतीचा पत्ता नाही तसेच सिमेंटही वेगळ्याच प्रकारचे दिसून येत असल्याने या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कामाची गुणवत्ता कायम राखण्याच्या अटीवर शासनाकडून कोट्यवधीचा कंत्राट देण्यात आला. पण, कंत्राटदाराने मनमर्जी कारभार चालवून रस्त्याची वाट लावण्याचा विडा उचलल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. या रस्त्यावरील मुरुमाची गरज पुर्ण करण्यासाठी महामार्गावरील खदानी सोडून आष्टी-परसोडा रस्त्यावरील डोंगरगाव खदान पोखरुन टाकली आहे. त्यातही १ ब्रासच्या रॉयल्टीवर ५ ब्रासचा डंपर ओव्हरलोड करुन नेतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. शिवाय शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. या रस्त्यावर अनेक अपघातही होत आहे. त्यामुळे या सर्व कामाची चौकशी करून कंत्राटदाराला दर्जेदार काम करण्याची ताकीद द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू भार्गव व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कामाकडे फिरकतच नाहीराष्ट्रीय महामार्गाचे काम नियमानुसार केले जात असून काम करताना दर्जा सांभाळला जात आहे. बांधकामात वाळू व दगडाची भुकटी वापरल्या जाते, असे आर.आर. कंपनीचे विभागीय अधिकारी राजेंद्र अढाऊ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विशेषत: या कामाकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून फिरकलेच नसल्याने कंत्राटदाराला मनमर्जीने काम करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. या सदोष बांधकामामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.तळेगाव-आष्टी-साहूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम फारच निकृष्ट सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याची वाट लावली जात आहे. कंस्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी मुजोर आहे. त्यांनी नागरिकांच्या जीवनाशी खेळ मांडला आहे. याप्रकरणी वेळीच दखल घेतली नाही तर उपोषणही केले जाईल.सोनू भार्गव, तालुकाध्यक्ष, रायुकाँ, आष्टी (शहीद)धाडी गावाजवळ पाच-सहा मोठमोठे पूल बांधले. मात्र, निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामावर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे भविष्यात हे काम धोकादायक ठरणार आहे. तक्रार केल्यावर कंपनीचे अधिकारी अरेरावी करतात.विजय मानकर, शेतकरी.

टॅग्स :highwayमहामार्ग