शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: October 15, 2014 23:21 IST

गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही

पुलगाव : गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही उपाययोजना केल्या; परंतु तेवढ्याने या रोगाचे आक्रमण थांबले नसून आजाराने नव्याने डोके वर काढले आहे. आजाराचे प्रमाण काढल्याने खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. शहरातील बोहरा गल्लीतील एक व इरिराम नगरातील दोन अशा तीन रुग्णांना वर्धा येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचार कार्यात मशगूल असणाऱ्या नगरसेवकांना स्वत:च्या प्रभागांतील स्वच्छता व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष पुरविण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या स्वच्छ नसल्याची तर साफ झालेल्या नाल्यातील घाण नालीकाठीच पडली असल्याची नागरिकांची ओरड आहे. गांधी चौक धर्मशाळा, फुटाणा लाईनजवळील भाग दीनदयाल चौक हे नित्याचे वर्दळीचे ठिकाण असूनही याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बोहरा गल्ली, हरिरामनगर येथील साचलेला केर कचरा व हरिराम नगरातून वाहणारा नाला यातील केरकचरा व घाणीमुळे या भागात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बोहरा गल्लीतील समिना मुस्तफा बोहरा (३०) इरिराम नगरातील प्रशांत प्रकाश राठी (३०) व अमीत राठी (३६) या तिघांना डेंग्यूसदृश आजाराची बाधा झाली. त्यांना वर्धा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ जास्त वाढण्यापूर्वीच स्थानीय प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरात फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्याची गरज आहे. तसेच आरोग्य व्यवस्थाही रुग्णांना चांगले उपचार देण्यात कमी पडत आहे. परिसराची स्वच्छता न केल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता व्हक्त होत आहे. परिसरातील रुग्णही येथे उपचार घ्यायला येतात. या कारणामुळेही आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.(तालुका प्रतिनिधी)