शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: October 15, 2014 23:21 IST

गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही

पुलगाव : गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही उपाययोजना केल्या; परंतु तेवढ्याने या रोगाचे आक्रमण थांबले नसून आजाराने नव्याने डोके वर काढले आहे. आजाराचे प्रमाण काढल्याने खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. शहरातील बोहरा गल्लीतील एक व इरिराम नगरातील दोन अशा तीन रुग्णांना वर्धा येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचार कार्यात मशगूल असणाऱ्या नगरसेवकांना स्वत:च्या प्रभागांतील स्वच्छता व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष पुरविण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या स्वच्छ नसल्याची तर साफ झालेल्या नाल्यातील घाण नालीकाठीच पडली असल्याची नागरिकांची ओरड आहे. गांधी चौक धर्मशाळा, फुटाणा लाईनजवळील भाग दीनदयाल चौक हे नित्याचे वर्दळीचे ठिकाण असूनही याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बोहरा गल्ली, हरिरामनगर येथील साचलेला केर कचरा व हरिराम नगरातून वाहणारा नाला यातील केरकचरा व घाणीमुळे या भागात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बोहरा गल्लीतील समिना मुस्तफा बोहरा (३०) इरिराम नगरातील प्रशांत प्रकाश राठी (३०) व अमीत राठी (३६) या तिघांना डेंग्यूसदृश आजाराची बाधा झाली. त्यांना वर्धा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ जास्त वाढण्यापूर्वीच स्थानीय प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरात फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्याची गरज आहे. तसेच आरोग्य व्यवस्थाही रुग्णांना चांगले उपचार देण्यात कमी पडत आहे. परिसराची स्वच्छता न केल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता व्हक्त होत आहे. परिसरातील रुग्णही येथे उपचार घ्यायला येतात. या कारणामुळेही आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.(तालुका प्रतिनिधी)