शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

देशप्रेम प्रत्यक्ष कृतीत उतरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:50 IST

स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : आधार फाऊंडेशनचा माँ राणी कला महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.येथील आधार फाऊंडेशन व्दारा आयोजित माँ राणी कला महोत्सवात विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी शिव प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष हेमंत गडकरी, उद्योजक शंकर गुल्हाने, महेश गुल्हाने, अशोक चांडक, राहुल शर्मा, दीपक मांडवकर, प्रमोद श्रीराव, देवा निखाडे, किशोर गुजरकर, माया उमाटे, मोना किंमतकर, आशिष आकरे, स्नेहा आकरे, सुधीर चाफले, अशोक वांदिले, आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना अनासपुरे म्हणाले की, समाजात आज सुसंवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक गैरसमज आपल्यामध्ये निर्माण होत आहे. समाजाचं आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आपल्याला एकमेकांशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद ठेवावा लागेल. समाजात आज चांगलं काम करणाºयांची संख्या अतिशय कमी आहे. अशा सर्व लोकांची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय समाजाचं भलं होणार नाही.शेतात राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळालाच पाहीजे. शेतकºयांमुळेच आज आपण जीवंत आहोत, त्यांनी जर शेती करणे सोडले तर आपल्या जवळ कितीही पैसा असू द्या, आपण जीवंत राहू शकणार नाही, त्यामुळे शेतकरी सुखा, समाधानानं जगला पाहीजे याची काळजी समाजाने व शासनाने घेणे गरजेचे असल्याचेही अनासपूरे यांनी सांगितले.युवकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, हुंडा घेवू नका, कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, चांगले संस्कार स्वत:च्या अंगी निर्माण करून देश सेवेसाठी आपण पुढे आले पाहीजे. समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा समाजासाठी आपण काय करतो? याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विदर्भाविषयी ते म्हणाले की, विदर्भाची भूमी ही सुपीक आहे आणि त्यामुळेच इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा होवून गेल. असे सांगत या संताच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग त्यांनी विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी विहिरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार निलेश गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार फाऊंडेशनच्या विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील विविध भागातून नागरिकांची मोठी गर्दी होती. आयोजन समित्यांनी उत्तम नियोजन केल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.समाजहितार्थ कार्याचा झाला गौरवपर्यावरण विषयासंदर्भातही अनासपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी झाडांचे महत्व विषद करताना झाड स्वत: काही न मागता समाजाला सतत ते काही न काही देत असतात, त्यामुळे आपणही समाजाला काही तरी दिलं पाहीजे अशी भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान मान्यवराच्या हस्ते समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. त्यामध्ये पुरात बस मध्ये अडकलेल्या प्रवाश्यांचे जीव वाचविणाºया सातेफळ येथील ग्रामस्थांचा मकरंद अनासपुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी हेमंत गडकरी यांनीही मार्गदर्शन करुन कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरे