शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारात लोकशाहीतील पारदर्शकता हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:38 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर पार्टीचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही. शहर वाढत चालली आहे, खेडे ओस पडत आहे. त्यामुळे भविष्यात खेडे वाचविण्यासाठी कृषीवर आधारीत उद्योग निर्माण करावे लागतील, असे प्रतिपादन लोकजागर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.सेवाग्राम येथे लोकजागर पार्टी आणि किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाकुडकर यांनी लोकजागर पार्टीचा आठ कलमी कार्यक्रम उपस्थितांना समजावून दिला. यात गाव तेथे उद्योग, कृषी धर्म, कृषी संस्कृती, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, एक गाव एक परिवार, युवा भारत नवा भारत, गतीशिल न्यायालय, पारदर्शक न्याय (कोणत्याही खटल्याचा निकाल तीन वर्षांच्या आत लागला पाहिजे.) तसेच उमेदवारांवरील सर्व खटल्याचा निकाल एक वर्षाच्या आत लागल्यास राजकारणातील गुन्हेगारी नष्ट होईल. आदी मुद्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीवर आधारीत उद्योग निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.किसान मंचाचे प्रताप गोस्वामी यांनी वर्धा जिल्ह्यात कपाशी व तुराट्या याच्या आधारावर उद्योग निर्माण होवू शकतो. अगरबत्ती काडी मलेशिया व चाईनावरून आणावी लागते. विदर्भात बांबू मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो. त्यावर आधारीत उद्योग निर्माण झाल्यास दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले.कार्यशाळेला लोकजागर पार्टीचे राष्ट्रीय महासचिव महादेव मिरगे, जयप्रकाश पवार, डी. व्ही. पडीले, जिल्हाध्यक्ष मनिष नांदे यांच्यासह वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जवळगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि लातुर, ठाणे, गडचिरोली येथील पदाधिकारी तसेच कार्यकत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपा