शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

भाजप सरकारात लोकशाहीतील पारदर्शकता हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:38 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर पार्टीचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही. शहर वाढत चालली आहे, खेडे ओस पडत आहे. त्यामुळे भविष्यात खेडे वाचविण्यासाठी कृषीवर आधारीत उद्योग निर्माण करावे लागतील, असे प्रतिपादन लोकजागर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.सेवाग्राम येथे लोकजागर पार्टी आणि किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाकुडकर यांनी लोकजागर पार्टीचा आठ कलमी कार्यक्रम उपस्थितांना समजावून दिला. यात गाव तेथे उद्योग, कृषी धर्म, कृषी संस्कृती, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, एक गाव एक परिवार, युवा भारत नवा भारत, गतीशिल न्यायालय, पारदर्शक न्याय (कोणत्याही खटल्याचा निकाल तीन वर्षांच्या आत लागला पाहिजे.) तसेच उमेदवारांवरील सर्व खटल्याचा निकाल एक वर्षाच्या आत लागल्यास राजकारणातील गुन्हेगारी नष्ट होईल. आदी मुद्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीवर आधारीत उद्योग निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.किसान मंचाचे प्रताप गोस्वामी यांनी वर्धा जिल्ह्यात कपाशी व तुराट्या याच्या आधारावर उद्योग निर्माण होवू शकतो. अगरबत्ती काडी मलेशिया व चाईनावरून आणावी लागते. विदर्भात बांबू मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो. त्यावर आधारीत उद्योग निर्माण झाल्यास दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले.कार्यशाळेला लोकजागर पार्टीचे राष्ट्रीय महासचिव महादेव मिरगे, जयप्रकाश पवार, डी. व्ही. पडीले, जिल्हाध्यक्ष मनिष नांदे यांच्यासह वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जवळगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि लातुर, ठाणे, गडचिरोली येथील पदाधिकारी तसेच कार्यकत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपा