शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याची मागणी

By admin | Updated: October 19, 2016 01:33 IST

जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ३ टक्के व्याजदराने पैसे देवून अवैध सावकारांनी हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे वर्धा : जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ३ टक्के व्याजदराने पैसे देवून अवैध सावकारांनी हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सावकारीत व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात संबंधीत शेतकऱ्यांची शेतजमीन सावकाराने आपले नावे रजिस्टर विक्री करून घेतली. विक्री जरी करून घेतली तरी गेली अनेक वर्षे व आजही सदर शेतजमीन सावकारग्रस्त मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात व वहिवाटीत व कब्जात आहे. त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य किसान सभेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी विविध मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. ही शेतजमीन जर सावकारांना विक्री केली तर सर्वच शेतकरी भूमिहिन होतात. या शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले अवैध कर्ज व व्याज परत केल्यानंतर सदर शेताची पुन्हा फेरविक्री संबंधीत शेतकऱ्यांचे नावे केली जाईल असे ठरले होते. मात्र शेतकऱ्यांकडून व्याज व मु्द्दलाची रक्कम सावकाराने वसूल केली व शेताची फेरविक्रीकरिता आणखी अतिरिक्त लाखो रूपये या सावकारांकडून मागितल्या जात आहे. सावकारांना जरी सावकारी पैशात शेताची विक्री करून दिली तरी शेत मूळ शेतकऱ्याच्या कब्जात, ताब्यात व वहिवाटीत आहे. सर्व शेतकऱ्यांनी नावे वहिवाटीदार म्हणून ६ ब मध्ये नोंद घेण्याबाबत तहसीलदार, हिंगणघाट, समद्रपूर, वर्धा यांना वर्षभरापूर्वी अर्ज केले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे किसान सभेने निवदेनातून म्हटले आहे. धरणे आंदोलनाकरिता यशवंत झाले, बाळकृष्ण तिमांडे, जगन चांभारे, आनंद पिदुरकर, आत्माराम कोळसे, देवीदास ढगे, घनश्याम डफ, बंडू बावणे, रामभाउ खेलकर, अट्टेल, देवेंद्र शिनगारे, गजानन काळे, मारोती खोकले, आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी झालेल्या सभेत यशवंत झाडे, महेश दुबे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, सिताराम लोहकरे, सुनिल घीमे, संजय भगत यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)