शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खत वाढल्याने शेणखताला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे.

ठळक मुद्देएक ट्रॅाली पाच हजार रुपयाला

  विनोद घोडे    लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एकीकडे रासायनिक खतांचे भाव वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. पण,  रासायनिक खताच्या अतिरेकी व असंतुलीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. शिवाय उत्पदीत मालाची, जमिनीची पोत खालावली असून मानवाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकणातून शेतकऱ्यांसाठी शेणखत, सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे.कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. शेखणत शेतात तयार करून त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे उत्पादीत मालाची प्रत सुधारून उत्पादन खर्चात सुद्धा बचत होईल. शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखत यासारखी सेंद्रीय खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार  करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी किशाेर बन्नगरे यांनी सांगितले. 

रासायनिक खताचे विपरित परिणाम प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढली आहे. शेती व्यवसायातही अधिक उत्पादन कसे घेता येईल, याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली. महागड्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्राव्ये नष्ट होत असून जमीन कडक येत आहे. यामुळे जमिनीची पत घसरत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे मानवाच्या आराेग्यासही हानीकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

शेणखत वापरल्यास उत्पादन खर्चात बचतशेणखताच्या वापराने जमिनीची सुपिकता टिकुन राहते. आणि विषमुक्त अन्न धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. त्याचप्रमाणे  उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्याने शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करण्याची गरज आहे. असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. 

रासायनिक आणि शेणखतांचे दर शेखणत ५ हजार रूपये प्रती ट्रॉली, तर रासायनिक खत, सर्वच खत प्रती ५० किलोची बॅग, युरीया २५५ रूपये, १०:२६:२६ -१३५० रूपये, डीएपी - १४५० रूपये, २०:२०:० - १०५० रूपये, १८:१८:१०- १०५० रूपये, सुपर फॉस्फेट -४५० रूपये बॅग अशी रासायनिक आणि शेणखताचे दर आहेत. 

टॅग्स :agricultureशेती