शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रासायनिक खत वाढल्याने शेणखताला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे.

ठळक मुद्देएक ट्रॅाली पाच हजार रुपयाला

  विनोद घोडे    लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एकीकडे रासायनिक खतांचे भाव वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. पण,  रासायनिक खताच्या अतिरेकी व असंतुलीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. शिवाय उत्पदीत मालाची, जमिनीची पोत खालावली असून मानवाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकणातून शेतकऱ्यांसाठी शेणखत, सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे.कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. शेखणत शेतात तयार करून त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे उत्पादीत मालाची प्रत सुधारून उत्पादन खर्चात सुद्धा बचत होईल. शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखत यासारखी सेंद्रीय खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार  करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी किशाेर बन्नगरे यांनी सांगितले. 

रासायनिक खताचे विपरित परिणाम प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढली आहे. शेती व्यवसायातही अधिक उत्पादन कसे घेता येईल, याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली. महागड्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्राव्ये नष्ट होत असून जमीन कडक येत आहे. यामुळे जमिनीची पत घसरत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे मानवाच्या आराेग्यासही हानीकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

शेणखत वापरल्यास उत्पादन खर्चात बचतशेणखताच्या वापराने जमिनीची सुपिकता टिकुन राहते. आणि विषमुक्त अन्न धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. त्याचप्रमाणे  उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्याने शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करण्याची गरज आहे. असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. 

रासायनिक आणि शेणखतांचे दर शेखणत ५ हजार रूपये प्रती ट्रॉली, तर रासायनिक खत, सर्वच खत प्रती ५० किलोची बॅग, युरीया २५५ रूपये, १०:२६:२६ -१३५० रूपये, डीएपी - १४५० रूपये, २०:२०:० - १०५० रूपये, १८:१८:१०- १०५० रूपये, सुपर फॉस्फेट -४५० रूपये बॅग अशी रासायनिक आणि शेणखताचे दर आहेत. 

टॅग्स :agricultureशेती