शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रासायनिक खत वाढल्याने शेणखताला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे.

ठळक मुद्देएक ट्रॅाली पाच हजार रुपयाला

  विनोद घोडे    लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एकीकडे रासायनिक खतांचे भाव वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. पण,  रासायनिक खताच्या अतिरेकी व असंतुलीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. शिवाय उत्पदीत मालाची, जमिनीची पोत खालावली असून मानवाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकणातून शेतकऱ्यांसाठी शेणखत, सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे.कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. शेखणत शेतात तयार करून त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे उत्पादीत मालाची प्रत सुधारून उत्पादन खर्चात सुद्धा बचत होईल. शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखत यासारखी सेंद्रीय खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार  करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी किशाेर बन्नगरे यांनी सांगितले. 

रासायनिक खताचे विपरित परिणाम प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढली आहे. शेती व्यवसायातही अधिक उत्पादन कसे घेता येईल, याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली. महागड्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्राव्ये नष्ट होत असून जमीन कडक येत आहे. यामुळे जमिनीची पत घसरत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे मानवाच्या आराेग्यासही हानीकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

शेणखत वापरल्यास उत्पादन खर्चात बचतशेणखताच्या वापराने जमिनीची सुपिकता टिकुन राहते. आणि विषमुक्त अन्न धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. त्याचप्रमाणे  उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्याने शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करण्याची गरज आहे. असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. 

रासायनिक आणि शेणखतांचे दर शेखणत ५ हजार रूपये प्रती ट्रॉली, तर रासायनिक खत, सर्वच खत प्रती ५० किलोची बॅग, युरीया २५५ रूपये, १०:२६:२६ -१३५० रूपये, डीएपी - १४५० रूपये, २०:२०:० - १०५० रूपये, १८:१८:१०- १०५० रूपये, सुपर फॉस्फेट -४५० रूपये बॅग अशी रासायनिक आणि शेणखताचे दर आहेत. 

टॅग्स :agricultureशेती