शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे त्वरित देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:52 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. ही शासनाने केलेली शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यंदाचा हंगाम व पेरणीची वेळ आली असून पैसे नसल्याने पेरणी कशी करावी, ही चिंता शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. याकडे लक्ष देत त्वरित चुकारे द्यावेत, अशी मागणी प्रहारने केली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी संजय दैणे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

प्रहारची मागणी : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. ही शासनाने केलेली शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यंदाचा हंगाम व पेरणीची वेळ आली असून पैसे नसल्याने पेरणी कशी करावी, ही चिंता शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. याकडे लक्ष देत त्वरित चुकारे द्यावेत, अशी मागणी प्रहारने केली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी संजय दैणे यांना निवेदनही देण्यात आले आहे.मागील वर्षी शेतकºयांच्या तुरीची नाफेडमार्फत खरेदी करण्यात आली; पण चुकारे मात्र अद्यापही देण्यात आले नाहीत. शिवाय काही शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली नाही. या सरकारने बाहेरील देशातील तूर आयात केली. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असून जाणीवपूर्वक हा प्रकार करीत आहे. शेतकºयांना आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. शासनाने याकडे लक्ष देत त्वरित तुरीचे चुकारे द्यावे, उर्वरित तूर खरेदी करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात शिल्लक असलेली तूर भरू व अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही प्रहारने दिला आहे.हंगामासमोर संकटखरीप हंगाम उंबरठ्यावर आला असताना अद्यापही शेतकºयांना तुरीचे चुकारे मिळालेले नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहेत. खरीप हंगामासाठी बियाणे, खतांची तजविज कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे प्रदान करीत शिल्लक राहिलेल्या तुरी व चण्याची खरेदी करणे गरजेचे झाले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही गरजची आहे.शिल्लक राहिलेल्या तूर व चण्याची खरेदी गरजेचीरोहणा - नाफेडच्या माध्यमातून केली जाणारी शासकीय तूर खरेदी १५ मे पासून बंद करण्यात आली. चणा खरेदी सुरुच करण्यात आली नहाी. यामुळे शेतकरी अडचणीत आले असून शासनाने तूर व चण्याची शासकीय खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.शासनाने आर्वी खरेदी-विक्री केंद्रात आतापर्यंत ३० हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असली तरी अद्याप नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांची तूर घरीच पडून आहे. नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले. गरजेपोटी शेतकऱ्यांना तुरी खासगी व्यापाऱ्यांना ४००० रुपयांत विकून गरज भागवावी लागत आहे. चण्याची शासकीय खरेदी सुरुच झाली नाही. आता खरीपाच्या हंगामासाठी बियाणे, खते व नांगरणी यासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अशावेळी शासनाने खरेदी केंद्र बंद करून शेतकºयांची मान खासगी व्यापाºयांच्या हातात दिली आहे. शेतकऱ्यांची अधिक परीक्षा न पाहता शासनाने तूर व चणा खरेदी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.