शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत.

ठळक मुद्देकोरोना, लॉकडाऊनचा परिणाम : १० मेगावॅटने वीजभार कमी

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी, लॉकडाऊन आणि वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात विजेची मागणी निम्मी म्हणजे ४० टक्क्यांनी घटली आहे.कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत. मार्च मध्यंतरी आणि अखेरच्या आठवड्यात तसेच ४ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात अधूनमधून गारवा निर्माण झाला. यामुळे आणि कोरोनाच्या धास्तीने प्रतिष्ठाने आणि घरोघरी कूलर, इतर वातानुकूलित यंत्रांचा होणारा वापर एप्रिल महिना सुरू होऊनदेखील बंद आहे. वर्धा शहरात ३४ हजार ४०० वीजग्राहकांची संख्या आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पिअर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता. यावेळी (८६७ अ‍ॅम्पिअर) १६.६७ इतका कमी भार आहे. त्यामुळे १० मेगावॅटचा भार या हंगामात कमी झाला आहे.कोरोना विषाणूला थंड वातावरण पोषक राहत असल्याची अफवा पसरल्याने मार्च महिन्यातच सुरू होणारे कुलर, वातानुकूलित यंत्र यंदा बंद आहे. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक वापर बंद आहे. शासकीय कार्यालये, उद्योगही ठप्प आहेत. घरगुती ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी विजेची मागणीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावेळी विजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मार्च महिन्यात दोनवेळा जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणच्या मालमत्तेची यात मोठी हानी झाली. मात्र, राज्यात कोरोनाचे वातावरण असतानाही जिवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीकार्य सुरूच ठेवले. दरवर्षी उन्हाळ्यात प्रारंभीच विजेची मागणी वाढत असल्याने भार वाढतो. यंदा कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे विजेचा वापर कमी झाला, पर्यायाने गतवर्षीच्या तुलनेत यावेळी मागणी घटली आहे.- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, वीज महावितरण, वर्धा. 

टॅग्स :electricityवीज