शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत.

ठळक मुद्देकोरोना, लॉकडाऊनचा परिणाम : १० मेगावॅटने वीजभार कमी

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी, लॉकडाऊन आणि वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात विजेची मागणी निम्मी म्हणजे ४० टक्क्यांनी घटली आहे.कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत. मार्च मध्यंतरी आणि अखेरच्या आठवड्यात तसेच ४ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात अधूनमधून गारवा निर्माण झाला. यामुळे आणि कोरोनाच्या धास्तीने प्रतिष्ठाने आणि घरोघरी कूलर, इतर वातानुकूलित यंत्रांचा होणारा वापर एप्रिल महिना सुरू होऊनदेखील बंद आहे. वर्धा शहरात ३४ हजार ४०० वीजग्राहकांची संख्या आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पिअर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता. यावेळी (८६७ अ‍ॅम्पिअर) १६.६७ इतका कमी भार आहे. त्यामुळे १० मेगावॅटचा भार या हंगामात कमी झाला आहे.कोरोना विषाणूला थंड वातावरण पोषक राहत असल्याची अफवा पसरल्याने मार्च महिन्यातच सुरू होणारे कुलर, वातानुकूलित यंत्र यंदा बंद आहे. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक वापर बंद आहे. शासकीय कार्यालये, उद्योगही ठप्प आहेत. घरगुती ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी विजेची मागणीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावेळी विजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मार्च महिन्यात दोनवेळा जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणच्या मालमत्तेची यात मोठी हानी झाली. मात्र, राज्यात कोरोनाचे वातावरण असतानाही जिवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीकार्य सुरूच ठेवले. दरवर्षी उन्हाळ्यात प्रारंभीच विजेची मागणी वाढत असल्याने भार वाढतो. यंदा कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे विजेचा वापर कमी झाला, पर्यायाने गतवर्षीच्या तुलनेत यावेळी मागणी घटली आहे.- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, वीज महावितरण, वर्धा. 

टॅग्स :electricityवीज