शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत.

ठळक मुद्देकोरोना, लॉकडाऊनचा परिणाम : १० मेगावॅटने वीजभार कमी

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी, लॉकडाऊन आणि वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात विजेची मागणी निम्मी म्हणजे ४० टक्क्यांनी घटली आहे.कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत. मार्च मध्यंतरी आणि अखेरच्या आठवड्यात तसेच ४ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात अधूनमधून गारवा निर्माण झाला. यामुळे आणि कोरोनाच्या धास्तीने प्रतिष्ठाने आणि घरोघरी कूलर, इतर वातानुकूलित यंत्रांचा होणारा वापर एप्रिल महिना सुरू होऊनदेखील बंद आहे. वर्धा शहरात ३४ हजार ४०० वीजग्राहकांची संख्या आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पिअर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता. यावेळी (८६७ अ‍ॅम्पिअर) १६.६७ इतका कमी भार आहे. त्यामुळे १० मेगावॅटचा भार या हंगामात कमी झाला आहे.कोरोना विषाणूला थंड वातावरण पोषक राहत असल्याची अफवा पसरल्याने मार्च महिन्यातच सुरू होणारे कुलर, वातानुकूलित यंत्र यंदा बंद आहे. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक वापर बंद आहे. शासकीय कार्यालये, उद्योगही ठप्प आहेत. घरगुती ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी विजेची मागणीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावेळी विजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मार्च महिन्यात दोनवेळा जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणच्या मालमत्तेची यात मोठी हानी झाली. मात्र, राज्यात कोरोनाचे वातावरण असतानाही जिवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीकार्य सुरूच ठेवले. दरवर्षी उन्हाळ्यात प्रारंभीच विजेची मागणी वाढत असल्याने भार वाढतो. यंदा कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे विजेचा वापर कमी झाला, पर्यायाने गतवर्षीच्या तुलनेत यावेळी मागणी घटली आहे.- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, वीज महावितरण, वर्धा. 

टॅग्स :electricityवीज