शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सट्टेबाजाराच्या हस्तक्षेपामुळे कापसाच्या भावबाजीवर अवकळा; १४ हजारांचा भाव ८ हजारापर्यंत उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 10:43 IST

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

हरिदास ढोक

देवळी(वर्धा) : आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आणि उत्पादनानुसार ठरविण्यात येणाऱ्या कापसाच्या भावबाजीला सध्या अवकळा आली आहे. कापसाच्या या व्यवसायात सट्टेबाजाराचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या मनमर्जीतून भावाबाबतची तेजी-मंदी ठरविली जात आहे. नव्हे तर कापसाचे संपूर्ण मार्केट सट्टेवाले चालवित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील हंगामातील १४ हजारांचा भाव या हंगामात प्रतिक्विंटल ८ हजारापर्यंत खाली आला आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. मागील वर्षीच्या भावाचा अंदाज घेता यावेळी शुभारंभाला १० हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु या अपेक्षेवर विरजण पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.

या हंगामातील अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणात येणाऱ्या कापूस व सोयाबीनच्या पिकाने यावेळी धोका दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी नावाचीच झाली आहे. त्यातच शेतमालाच्या भावबाजीचा फटका बसत असल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आघाडीच्या देशांनी परस्परांमध्ये असलेली व्यापाराची बंदी हटविल्याने सध्या हा बाजार अस्थिर झाला आहे. शिवाय दक्षिणेत सूत निर्मितीच्या मालाला उठाव नसल्याने हा माल पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कापसाचे भाव अजून खाली येऊन मंदीचे सावट राहणार असल्याचे बोलले जात आहे. गादी-रजई व इतर कामे करणाऱ्या रेचे चालकांनी येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन हे भाव प्रतिक्विंटल १२ हजारांपर्यंत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सट्टेबाजाराचा वाढता हस्तक्षेप तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या भावबाजीच्या चढउतारामुळे कापूस उत्पादक भरडला जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेऊन असलेले व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीला हीच परिस्थिती कारणीभूत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा