शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सट्टेबाजाराच्या हस्तक्षेपामुळे कापसाच्या भावबाजीवर अवकळा; १४ हजारांचा भाव ८ हजारापर्यंत उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 10:43 IST

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

हरिदास ढोक

देवळी(वर्धा) : आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आणि उत्पादनानुसार ठरविण्यात येणाऱ्या कापसाच्या भावबाजीला सध्या अवकळा आली आहे. कापसाच्या या व्यवसायात सट्टेबाजाराचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या मनमर्जीतून भावाबाबतची तेजी-मंदी ठरविली जात आहे. नव्हे तर कापसाचे संपूर्ण मार्केट सट्टेवाले चालवित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील हंगामातील १४ हजारांचा भाव या हंगामात प्रतिक्विंटल ८ हजारापर्यंत खाली आला आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. मागील वर्षीच्या भावाचा अंदाज घेता यावेळी शुभारंभाला १० हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु या अपेक्षेवर विरजण पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.

या हंगामातील अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणात येणाऱ्या कापूस व सोयाबीनच्या पिकाने यावेळी धोका दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी नावाचीच झाली आहे. त्यातच शेतमालाच्या भावबाजीचा फटका बसत असल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आघाडीच्या देशांनी परस्परांमध्ये असलेली व्यापाराची बंदी हटविल्याने सध्या हा बाजार अस्थिर झाला आहे. शिवाय दक्षिणेत सूत निर्मितीच्या मालाला उठाव नसल्याने हा माल पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कापसाचे भाव अजून खाली येऊन मंदीचे सावट राहणार असल्याचे बोलले जात आहे. गादी-रजई व इतर कामे करणाऱ्या रेचे चालकांनी येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन हे भाव प्रतिक्विंटल १२ हजारांपर्यंत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सट्टेबाजाराचा वाढता हस्तक्षेप तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या भावबाजीच्या चढउतारामुळे कापूस उत्पादक भरडला जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेऊन असलेले व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीला हीच परिस्थिती कारणीभूत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा