शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सट्टेबाजाराच्या हस्तक्षेपामुळे कापसाच्या भावबाजीवर अवकळा; १४ हजारांचा भाव ८ हजारापर्यंत उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 10:43 IST

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

हरिदास ढोक

देवळी(वर्धा) : आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आणि उत्पादनानुसार ठरविण्यात येणाऱ्या कापसाच्या भावबाजीला सध्या अवकळा आली आहे. कापसाच्या या व्यवसायात सट्टेबाजाराचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या मनमर्जीतून भावाबाबतची तेजी-मंदी ठरविली जात आहे. नव्हे तर कापसाचे संपूर्ण मार्केट सट्टेवाले चालवित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील हंगामातील १४ हजारांचा भाव या हंगामात प्रतिक्विंटल ८ हजारापर्यंत खाली आला आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. मागील वर्षीच्या भावाचा अंदाज घेता यावेळी शुभारंभाला १० हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु या अपेक्षेवर विरजण पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.

या हंगामातील अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणात येणाऱ्या कापूस व सोयाबीनच्या पिकाने यावेळी धोका दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी नावाचीच झाली आहे. त्यातच शेतमालाच्या भावबाजीचा फटका बसत असल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आघाडीच्या देशांनी परस्परांमध्ये असलेली व्यापाराची बंदी हटविल्याने सध्या हा बाजार अस्थिर झाला आहे. शिवाय दक्षिणेत सूत निर्मितीच्या मालाला उठाव नसल्याने हा माल पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कापसाचे भाव अजून खाली येऊन मंदीचे सावट राहणार असल्याचे बोलले जात आहे. गादी-रजई व इतर कामे करणाऱ्या रेचे चालकांनी येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन हे भाव प्रतिक्विंटल १२ हजारांपर्यंत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सट्टेबाजाराचा वाढता हस्तक्षेप तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या भावबाजीच्या चढउतारामुळे कापूस उत्पादक भरडला जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेऊन असलेले व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीला हीच परिस्थिती कारणीभूत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा