शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सट्टेबाजाराच्या हस्तक्षेपामुळे कापसाच्या भावबाजीवर अवकळा; १४ हजारांचा भाव ८ हजारापर्यंत उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 10:43 IST

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

हरिदास ढोक

देवळी(वर्धा) : आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आणि उत्पादनानुसार ठरविण्यात येणाऱ्या कापसाच्या भावबाजीला सध्या अवकळा आली आहे. कापसाच्या या व्यवसायात सट्टेबाजाराचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या मनमर्जीतून भावाबाबतची तेजी-मंदी ठरविली जात आहे. नव्हे तर कापसाचे संपूर्ण मार्केट सट्टेवाले चालवित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील हंगामातील १४ हजारांचा भाव या हंगामात प्रतिक्विंटल ८ हजारापर्यंत खाली आला आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. मागील वर्षीच्या भावाचा अंदाज घेता यावेळी शुभारंभाला १० हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु या अपेक्षेवर विरजण पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.

या हंगामातील अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणात येणाऱ्या कापूस व सोयाबीनच्या पिकाने यावेळी धोका दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी नावाचीच झाली आहे. त्यातच शेतमालाच्या भावबाजीचा फटका बसत असल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आघाडीच्या देशांनी परस्परांमध्ये असलेली व्यापाराची बंदी हटविल्याने सध्या हा बाजार अस्थिर झाला आहे. शिवाय दक्षिणेत सूत निर्मितीच्या मालाला उठाव नसल्याने हा माल पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कापसाचे भाव अजून खाली येऊन मंदीचे सावट राहणार असल्याचे बोलले जात आहे. गादी-रजई व इतर कामे करणाऱ्या रेचे चालकांनी येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन हे भाव प्रतिक्विंटल १२ हजारांपर्यंत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सट्टेबाजाराचा वाढता हस्तक्षेप तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या भावबाजीच्या चढउतारामुळे कापूस उत्पादक भरडला जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेऊन असलेले व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीला हीच परिस्थिती कारणीभूत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसwardha-acवर्धा