शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

दीनदयाल उपाध्याय योजनेत जिल्ह्याला ५५ कोटी

By admin | Updated: September 5, 2016 00:43 IST

विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

वर्धा : विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या सौर कृषीपंप उर्जीकरणाचा उद्घाटन कार्यक्रम कारंजा तालुक्यातील बोरगाव (ढोले) येथील देविदास रामधम यांच्या शेतात पार पडला. याप्रसंगी ना. बावनकुळे बोलत होते. पुढच्या ४० वर्षांत वर्धा जिल्ह्याला विजेची कमतरता भासणार नाही, अशा पध्दतीने वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये ३३ के.व्ही. सबस्टेशन, शेतकऱ्यांना शाश्वत वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी फीडर, भूमिगत विद्युतीकरण, गावठाण फीडर यासर्व बाबींचा समावेश असणार आहे. यामुळे सर्वांना वीज उपलब्ध होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सर्वासाठी वीज उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. यासाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करावी लागत असून या कामाकरिता २५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील जुन्या पायाभूत सुविधाच्या दुरुस्तीसाठी १० हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)