शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

दातृत्व ही मानवास मिळालेली अनमोल देणगी

By admin | Updated: February 7, 2015 23:30 IST

कुठल्याच परतफेडीची, फळाची अपेक्षा न करता आपल्याजवळ असणारी संपत्ती सढळ हाताने दान करून भुकेल्यास अन्नदानासाठी, अनाथांना आश्रय देण्यासाठी, दुसऱ्याचे अश्रु

सुवीरसागर महाराज : श्रीमद ज्ञानामृत कथमालेचे दुसरे पुष्पपुलगाव : कुठल्याच परतफेडीची, फळाची अपेक्षा न करता आपल्याजवळ असणारी संपत्ती सढळ हाताने दान करून भुकेल्यास अन्नदानासाठी, अनाथांना आश्रय देण्यासाठी, दुसऱ्याचे अश्रु पुसून त्यांच्या वेदना टिपण्यासाठी सत्कारणी लावणे ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. कारण दातृत्वगुण ही मानवास मिळालेली अनमोल देणगी होय असे मौलिक विचार मुनीश्री सुवीरसागर महाराज यांनी पुलगाव येथील श्रीमद् ज्ञानामृत कथामालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना व्यक्त केले.बुंदेलखंड येथील बरेठी या गावातील जयंतीमाता व शिवचंद या दाम्पत्यांचे पुत्र असणारे सुवीरसागर यांना दहा वर्षापूर्वी मुंबई येथे आचार्य सन्मती सागर महाराजांनी जैन धर्माची मुनीदीक्षा दिली. अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीरांचा ‘जिओ और जिने दो’ संदेश संपूर्ण जगभर पोहचविण्याचा संकल्प करून सर्वधर्मसमभाव, अहिंसा व शांती हे क्रांतीकारी विचार मुनीश्री आपल्या बोधामृत रसपानातून करीत आहे. यांच्या प्रवचनाला शहरातील सर्वत्र सामाजिक स्तरातून उत्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. ‘कर भला तो हो भला’ या विषयावर प्रवचनाचे द्वितीय पुष्प गुंफताना अकबर बिरबलाच्या एका कथेचा संदर्भ देवून दान व दातृत्वाबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले व बादशाहाच्या नवरत्न दरबारातील बिरबल हा जैन समाजाचा महामंत्री असल्याचे सांगितले. आजची बालके ही राष्ट्राचे भावी कर्णधार असून मुलांचे पालनपोषण करीत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार करणे पालकांचे कर्तव्य आहे. आई ही जगातील सर्वात अनमोल भेट असून प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतला आहे. आई हा आपला प्रथम गुरू असतो. देवालयातील परमेश्वराच्या चंदनापेक्षाही आईच्या पावलांची धूळ मस्तकी लावणारा अधिक भाग्यवान असतो. कुणाचेही चांगले होईल असेच काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दररोज सायंकाळी ६.३० वाजता कथास्थळावर संदीप जैन याच्या संगीत आनंदयात्रेचा नागरिक लाभ घेत आहे. महाआरती शरदचंद्र अवथनकर, सुरेश हनमंते, शास्त्रभेट बदनोरे यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)