शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाच्या घटीने तारणातही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:59 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला.

ठळक मुद्दे१७२ शेतकऱ्यांनी ठेवले ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन

महेश सायखेडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला. सोयाबीनची उतारी घटल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे निघालेले सोयाबीन विकण्याला प्राधान्य दिले. परिणामी जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदा तारणाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहेशासनाने सुरू केलेली शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांना तारणारी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला शेतमाल दर वाढीनंतर विक्री केल्यास मोठ्या फरकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १७२ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन सदर योजनेखाली तारण ठेवल्याची माहिती आहे.सिंदी (रेल्वे) बाजार समितीची उपसमिती असलेल्या सेलू बाजार समितीत यंदा दहा शेतकऱ्यांनी ३९१.३३ क्विंटल सोयाबीन, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ४३ शेतकऱ्यांनी १,५४०.९४ क्विंटल सोयाबीन, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ शेतकऱ्यांनी ४७०.१७ क्विंटर सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ शेतकऱ्यांनी २,३९०.६७ सोयाबीन शेतमाल तारण योजनेच्या अनुषंगाने ठेवले आहे.या उलट सन २०१६-१७ मध्ये सेलू उपबाजार समितीत २७ शेतकºयांनी ९०७.७९ क्विंटल सोयाबीन व नऊ शेतकºयांनी ३६७.७९ क्विंटल तूर आणि तीन शेतकऱ्यांनी २१८.५३ क्विंटल चना, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत २३७ शेतकऱ्यांनी ९७९४.२३ क्विंटल सोयाबीन व २२ शेतकºयांनी ४९९ क्विंटल तूर आणि ५३ शेतकऱ्यांनी २०४४. १४ क्विंटल चना, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१ शेतकऱ्यांनी २२२६.८२ क्विंटल सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २३९ शेतकऱ्यांनी ७६१३.५४ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.योजनेकडे शेतकºयांची पाठगत वर्षी शेतकऱ्यांनी २३,६७१.८४ क्विंटल शेतमाल सदर योजनेच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या गोदामांमध्ये ठेवला होता. यंदा केवळ ४,७९३.२० क्विंटल शेतमाल ठेवला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी सदर योजनेकडे पाठ केल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे.यंदा केवळ ९४.८ लाख वितरीतगत वर्षी जिल्ह्यातील ६५२ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेंतर्गत ठेवलेल्या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ४ कोटी ८४ लाख ६३ हजार १२ रुपये वितरीत करण्यात आले होते. तर यंदाच्या वर्षी १७२ शेतकऱ्यांच्या ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ९४ लाख ८ हजार ६१२ रुपये वितरीत करण्यात आले आहे.सहा महिन्याच्या आत विक्री अनिवार्यशेतमाल तारण योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेला विविध शेतमाल सहा महिन्यांच्या कालावधीत विक्री करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर शेतमाल ठेवायचा असल्यास वाढीव मुदतीचा प्रस्ताव संबंधितांना पाठवावा लागतो.