शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उत्पादनाच्या घटीने तारणातही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:59 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला.

ठळक मुद्दे१७२ शेतकऱ्यांनी ठेवले ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन

महेश सायखेडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला. सोयाबीनची उतारी घटल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे निघालेले सोयाबीन विकण्याला प्राधान्य दिले. परिणामी जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदा तारणाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहेशासनाने सुरू केलेली शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांना तारणारी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला शेतमाल दर वाढीनंतर विक्री केल्यास मोठ्या फरकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १७२ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन सदर योजनेखाली तारण ठेवल्याची माहिती आहे.सिंदी (रेल्वे) बाजार समितीची उपसमिती असलेल्या सेलू बाजार समितीत यंदा दहा शेतकऱ्यांनी ३९१.३३ क्विंटल सोयाबीन, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ४३ शेतकऱ्यांनी १,५४०.९४ क्विंटल सोयाबीन, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ शेतकऱ्यांनी ४७०.१७ क्विंटर सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ शेतकऱ्यांनी २,३९०.६७ सोयाबीन शेतमाल तारण योजनेच्या अनुषंगाने ठेवले आहे.या उलट सन २०१६-१७ मध्ये सेलू उपबाजार समितीत २७ शेतकºयांनी ९०७.७९ क्विंटल सोयाबीन व नऊ शेतकºयांनी ३६७.७९ क्विंटल तूर आणि तीन शेतकऱ्यांनी २१८.५३ क्विंटल चना, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत २३७ शेतकऱ्यांनी ९७९४.२३ क्विंटल सोयाबीन व २२ शेतकºयांनी ४९९ क्विंटल तूर आणि ५३ शेतकऱ्यांनी २०४४. १४ क्विंटल चना, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१ शेतकऱ्यांनी २२२६.८२ क्विंटल सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २३९ शेतकऱ्यांनी ७६१३.५४ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.योजनेकडे शेतकºयांची पाठगत वर्षी शेतकऱ्यांनी २३,६७१.८४ क्विंटल शेतमाल सदर योजनेच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या गोदामांमध्ये ठेवला होता. यंदा केवळ ४,७९३.२० क्विंटल शेतमाल ठेवला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी सदर योजनेकडे पाठ केल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे.यंदा केवळ ९४.८ लाख वितरीतगत वर्षी जिल्ह्यातील ६५२ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेंतर्गत ठेवलेल्या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ४ कोटी ८४ लाख ६३ हजार १२ रुपये वितरीत करण्यात आले होते. तर यंदाच्या वर्षी १७२ शेतकऱ्यांच्या ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ९४ लाख ८ हजार ६१२ रुपये वितरीत करण्यात आले आहे.सहा महिन्याच्या आत विक्री अनिवार्यशेतमाल तारण योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेला विविध शेतमाल सहा महिन्यांच्या कालावधीत विक्री करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर शेतमाल ठेवायचा असल्यास वाढीव मुदतीचा प्रस्ताव संबंधितांना पाठवावा लागतो.