शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

उत्पादनाच्या घटीने तारणातही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:59 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला.

ठळक मुद्दे१७२ शेतकऱ्यांनी ठेवले ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन

महेश सायखेडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला. सोयाबीनची उतारी घटल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे निघालेले सोयाबीन विकण्याला प्राधान्य दिले. परिणामी जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदा तारणाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहेशासनाने सुरू केलेली शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांना तारणारी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला शेतमाल दर वाढीनंतर विक्री केल्यास मोठ्या फरकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १७२ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन सदर योजनेखाली तारण ठेवल्याची माहिती आहे.सिंदी (रेल्वे) बाजार समितीची उपसमिती असलेल्या सेलू बाजार समितीत यंदा दहा शेतकऱ्यांनी ३९१.३३ क्विंटल सोयाबीन, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ४३ शेतकऱ्यांनी १,५४०.९४ क्विंटल सोयाबीन, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ शेतकऱ्यांनी ४७०.१७ क्विंटर सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ शेतकऱ्यांनी २,३९०.६७ सोयाबीन शेतमाल तारण योजनेच्या अनुषंगाने ठेवले आहे.या उलट सन २०१६-१७ मध्ये सेलू उपबाजार समितीत २७ शेतकºयांनी ९०७.७९ क्विंटल सोयाबीन व नऊ शेतकºयांनी ३६७.७९ क्विंटल तूर आणि तीन शेतकऱ्यांनी २१८.५३ क्विंटल चना, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत २३७ शेतकऱ्यांनी ९७९४.२३ क्विंटल सोयाबीन व २२ शेतकºयांनी ४९९ क्विंटल तूर आणि ५३ शेतकऱ्यांनी २०४४. १४ क्विंटल चना, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१ शेतकऱ्यांनी २२२६.८२ क्विंटल सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २३९ शेतकऱ्यांनी ७६१३.५४ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.योजनेकडे शेतकºयांची पाठगत वर्षी शेतकऱ्यांनी २३,६७१.८४ क्विंटल शेतमाल सदर योजनेच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या गोदामांमध्ये ठेवला होता. यंदा केवळ ४,७९३.२० क्विंटल शेतमाल ठेवला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी सदर योजनेकडे पाठ केल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे.यंदा केवळ ९४.८ लाख वितरीतगत वर्षी जिल्ह्यातील ६५२ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेंतर्गत ठेवलेल्या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ४ कोटी ८४ लाख ६३ हजार १२ रुपये वितरीत करण्यात आले होते. तर यंदाच्या वर्षी १७२ शेतकऱ्यांच्या ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ९४ लाख ८ हजार ६१२ रुपये वितरीत करण्यात आले आहे.सहा महिन्याच्या आत विक्री अनिवार्यशेतमाल तारण योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेला विविध शेतमाल सहा महिन्यांच्या कालावधीत विक्री करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर शेतमाल ठेवायचा असल्यास वाढीव मुदतीचा प्रस्ताव संबंधितांना पाठवावा लागतो.