शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निवडणुकीनंतर आरक्षणाच्या निर्णयाने माहोल झाला थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी काढल्यास एखादी विशिष्ट वॉर्ड यासाठी महत्त्वाचा ठरतो. अश्या राखीव वाॅर्डावर गाव पुढारी लक्ष देऊन निवडणुकीला सामोरे जातात. निवडणुकीदरम्यान प्रचारावर मोठा पैसाही खर्च होतो. तर सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण निवडणुका पार पडल्यावर निघाल्यास सरपंचाच्या निवडीच्या वेळी मोठी लॉबींग होते. शिवाय पाहिजे तसे राजकीय वातावरण तापत नाही.

ठळक मुद्देशासनाच्या निर्णयाचा परिणाम : पॅनल लढविणाऱ्या पुढाऱ्यावरील आर्थिक ताण होणार कमी

  लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय शासनाच्या निवडणूक विभागाने घेतला. या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासन सर्वच योजना आणि प्रयोग हे ग्रामीण स्तरावर करते. यामुळे याचा सर्वाधिक ताण गावपातळीवर नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सरपंचावर येतो. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी काढल्यास एखादी विशिष्ट वॉर्ड यासाठी महत्त्वाचा ठरतो. अश्या राखीव वाॅर्डावर गाव पुढारी लक्ष देऊन निवडणुकीला सामोरे जातात. निवडणुकीदरम्यान प्रचारावर मोठा पैसाही खर्च होतो. तर सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण निवडणुका पार पडल्यावर निघाल्यास सरपंचाच्या निवडीच्या वेळी मोठी लॉबींग होते. शिवाय पाहिजे तसे राजकीय वातावरण तापत नाही. गत काही दिवसांपूर्वी  शासनाने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले आणि नंतर ते रद्द केले. मग आता निवडणुकीनंतर आरक्षण काढणार असल्याने त्यावेळेस आरक्षण कसे ठरविणार या बाबतची चर्चा सध्या गावपातळीवर रंगत आहे.

शासनाचा निर्णय चुकीचाच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा शासनाचा निर्णय हा चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरपंच संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी दिली आहे. 

निवडणुकीतील चुरस आता कमी होणार निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत असल्याने या जागेवर कोण उभे राहणार याबाबत ग्रामीण भागात मोठी मोर्चे बांधणी केली जात होती. त्या जागेसाठी सारा कस लागत होता. परंतु, निवडणुकीनंतर आरक्षण काढण्याची घोषणा केल्याने निवडणुकीची चुरस कमी हाेईल, असे अनेकांना वाटते.

शासनाने वेळीच मंथन करण्याची गरज आहेआरक्षण निवडणुकी अगोदर जाहीर झाल्यास उमेदवाराला कागद पत्राची जुळवा जुळव करण्यास वेळ मिळतो. पण हे सर्वच प्रयोग सरपंच पदासाठी करतात हाच निर्णय सर्वच निवडणुकीत का लावला जात नाही. यावर शासनाने मंथन करण्याची गरज आहे. - संजय वाणी, सरपंच, दहेगाव (गोसावी).

विधानसभेत ५० टक्के जागा महिलांसाठी ठेवासरपंच, सदस्यांचे आरक्षणामुळे सर्वच समाजाला न्याय मिळतो. असे प्रयोग लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी झाले पाहिजे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ५० टक्के जागा आरक्षित का केल्या जात नाही. या बाबत कमालीची राजकीय उदासिनता आहे.- ज्योती घंगारे,                         सरपंच, घोराड.

आरक्षणाचे सारे प्रयोग सरपंचांवरच का?ग्रा.पं. स्तरावर अनेक प्रयोग शासन करते. पुर्वीचे काढलेले आरक्षण रद्द करण्यात आल्याने सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे सदस्य निवडून आल्यावरच कळणार आहे. असे असले तरी आरक्षणाचा प्रयोग सरपंचपदासाठीच काय हा येथे प्रश्न कायम आहे.- प्रमाेद गव्हाळे,सरपंच, खापरी.

 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत