शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

मृताचा वारस चढविल्यावर कर्जमाफीचा मिळेल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९१६ प्रकरणे प्रमाणिकरण करण्यात आली असून ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३०० पेक्षा अधिक प्रकरणे : बँकेत प्रक्रिया करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सध्या जिल्ह्यात केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून २ हजार ८१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले, पण मृत्यू झालेले असे आतापर्यंत एकूण ३०० हून अधिक प्रकरणे पुढे आली आहेत. या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांनी बँक खात्यात शासकीय मदत वळती होण्यासह कर्जाची रक्कम निरंक होण्यासाठी बँकेत जाऊन बँक खात्यात वारस चढविणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्या गरजूला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करून अंमलबजावणीला सुरूवात केली. वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९१६ प्रकरणे प्रमाणिकरण करण्यात आली असून ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे. तर उर्वरित २ हजार ८१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण केले जात आहे. आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी आतापर्यंतच्या प्रक्रियेत ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या प्रकरणात त्रुटी आढळल्या आहेत. यात बहुतांश पात्र लाभार्थी शेतकरी मृत असल्याचे पुढे आले आहे. याच शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाऊन मृत तथा पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्याचा वारस जोडणे क्रमप्राप्त आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या लाभार्थ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.४३०.५४ कोटी शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमाआतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४८ हजार ३९९ शेतकºयांच्या बँक खात्यात ४३०.५४ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे.२२ प्रमुख बॅँकांच्या १४४ शाखाजिल्ह्यात प्रमुख एकूण २२ बँकांच्या सुमारे १४४ शाखा आहेत. याच बँकांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ सध्या जिल्ह्यातील हवालदिल शेतकºयांना दिला जात आहे.आतापर्यंत ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४३०.५४ कोटी वळते करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर २ हजार ८१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण केले जात आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेले; पण मृत्यू झालेले अशी ३०० हून अधिक प्रकरणे आतापर्यंत चौकशीत पुढे आली आहेत. त्यामुळे या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मृत शेतकऱ्यांचा वारस कोण, हे बँकेत जात आवश्यक कागदपत्रे देऊन नाव चढवावे. त्यानंतरच अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक