शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कर्ज पुनर्गठणातही भुर्दंडच

By admin | Updated: June 13, 2015 02:08 IST

जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये पैसेवारी ५० टक्केच्या आत होती. यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांकरिता काही योजना आखल्या.

योजनेतून धूळफेक : शेतकऱ्यांवर पुन्हा दीर्घकाळासाठी कर्जबाजारीपणाच प्रशांत हेलोंडे वर्धाजिल्ह्यात २०१४-१५ मध्ये पैसेवारी ५० टक्केच्या आत होती. यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांकरिता काही योजना आखल्या. सावकारांचे कर्ज माफ करीत बँकांच्या कर्जाच्या पुनर्गठणाचे निर्देश दिले; पण यातही बँकांच्या नियमानुसार कारवाईची अट ठेवली. सध्या ही अटच पीक कर्ज पुनर्गठणाच्या आड येत असल्याचे दिसते. यातही शेतकऱ्यांनाच भुर्दंड सोसावा लागत आहे.शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे २०१४-१५ मधील पीक कर्ज पुनर्गठित करण्यात येत आहे. तत्पूर्वीच्या कर्जाचा यात समावेश नसल्याने गतवर्षी एक लाख रुपयांचे कर्ज असेल तर त्याचेच तुकडे पाडले जातील. पूर्वीच्या कर्जावर मात्र व्याज सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांना सरासरी २० हजार रुपये एकर याप्रमाणे पीक कर्ज दिले जाते. एक लाखांवरील कर्ज असल्यास शेतकऱ्यांना शेतीचे गहाणखत करावे लागणार आहे. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. यामुळे कर्जाचे तुकडे पाडतानाही शेतकऱ्यांना भुर्दंडच सोसावा लागणार आहे. एक लाखांवरील कर्जासाठी २ हजार ५०० रुपये वकील, कर्जाच्या रकमेवर अर्धा टक्का नोंदणी आणि एकूण रकमेवर अडीच टक्के गहाण खताचा असा तब्बल २० हजार रुपयांवर खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शिवाय सर्च रिपोर्ट खर्चही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे शासनाने पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. यातून दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी बँकांच्या नियमानुसारच सर्व प्रकरणे हाताळली जातील, ही अट कायम ठेवली. यात एक लाखांवरील कर्जाच्या पुनर्गठणासाठी गहाणखत करण्याची अट असल्याने शेतकरी कात्रीत अडकले आहेत. शेतकऱ्यांकडे पैसा असता तर कर्जाचे हप्ते पाडून घेण्याची वेळ उद्भवली असती काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बँकांच्या या अटींमुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठण नकोसे झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. कर्जाचे पुनर्गठण करताना रकमेचे पाच वार्षिक हप्ते पडणार आहेत. यात पहिला कर्जाचा हप्ता जून २०१६ मध्ये शेतकऱ्यांना भरावा लागणार असून पहिल्या वर्षी व्याज लागणार नाही. दुसऱ्या वर्षापासून मात्र व्याज आकारले जाणार आहे. हे व्याज नगण्य असले तरी गहाणखत, सर्च रिपोट या खर्चासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासन, प्रशासन व बँकांनी ही खर्चिक बाब टाळणे गरजेचे झाले आहे.गहाणखत, सर्च रिपोर्टच्या नावावर २० हजारांचा खर्च एखाद्या शेतकऱ्यावर दीड लाख रुपयांचे कर्ज असेल तर त्याला गहाणखत व सर्च रिपोर्टचा खर्च स्वत: करावा लागणार आहे. याचा हिशेब केल्यास सात हजार रुपये गहाण खत खर्च, कागदपत्रांकरिता येणारा अन्य खर्च आणि सर्च रिपोर्टला लागणारा खर्च असा साधारण २० हजारांच्या जवळपास भुर्दंड सोसावा लागतो. शेतकऱ्यांकडे २० हजार रुपये असतील तर तो तेवढ्या पैशात तात्पूरती शेतीची कामे उरकणार नाही काय, कर्ज पुनर्गठणाच्या भानगडीत कशाला पडेल, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करताना दिसतात. बँक नियमाप्रमाणेच पुनर्गठण२०१४-१५ मध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरीच कर्ज पुनर्गठणासाठी पात्र आहेत. त्यापूर्वीचे कर्जदार शेतकरी पात्र नाही. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होणार असून त्यांना नवीन कर्जही उपलब्ध होऊ शकते; पण ही संपूर्ण प्रक्रिया बँकेच्या नियमानुसारच होणार असल्याची लीड बँकेचे देवपुजारी यांनी सांगितले. पीक कर्ज पुनर्गठणाबाबत तक्रारी येत असल्याचेही त्यांनी मान्य केले.