शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कर्ज पुनर्गठणातही भुर्दंडच

By admin | Updated: June 13, 2015 02:08 IST

जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये पैसेवारी ५० टक्केच्या आत होती. यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांकरिता काही योजना आखल्या.

योजनेतून धूळफेक : शेतकऱ्यांवर पुन्हा दीर्घकाळासाठी कर्जबाजारीपणाच प्रशांत हेलोंडे वर्धाजिल्ह्यात २०१४-१५ मध्ये पैसेवारी ५० टक्केच्या आत होती. यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांकरिता काही योजना आखल्या. सावकारांचे कर्ज माफ करीत बँकांच्या कर्जाच्या पुनर्गठणाचे निर्देश दिले; पण यातही बँकांच्या नियमानुसार कारवाईची अट ठेवली. सध्या ही अटच पीक कर्ज पुनर्गठणाच्या आड येत असल्याचे दिसते. यातही शेतकऱ्यांनाच भुर्दंड सोसावा लागत आहे.शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे २०१४-१५ मधील पीक कर्ज पुनर्गठित करण्यात येत आहे. तत्पूर्वीच्या कर्जाचा यात समावेश नसल्याने गतवर्षी एक लाख रुपयांचे कर्ज असेल तर त्याचेच तुकडे पाडले जातील. पूर्वीच्या कर्जावर मात्र व्याज सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांना सरासरी २० हजार रुपये एकर याप्रमाणे पीक कर्ज दिले जाते. एक लाखांवरील कर्ज असल्यास शेतकऱ्यांना शेतीचे गहाणखत करावे लागणार आहे. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. यामुळे कर्जाचे तुकडे पाडतानाही शेतकऱ्यांना भुर्दंडच सोसावा लागणार आहे. एक लाखांवरील कर्जासाठी २ हजार ५०० रुपये वकील, कर्जाच्या रकमेवर अर्धा टक्का नोंदणी आणि एकूण रकमेवर अडीच टक्के गहाण खताचा असा तब्बल २० हजार रुपयांवर खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शिवाय सर्च रिपोर्ट खर्चही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे शासनाने पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. यातून दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी बँकांच्या नियमानुसारच सर्व प्रकरणे हाताळली जातील, ही अट कायम ठेवली. यात एक लाखांवरील कर्जाच्या पुनर्गठणासाठी गहाणखत करण्याची अट असल्याने शेतकरी कात्रीत अडकले आहेत. शेतकऱ्यांकडे पैसा असता तर कर्जाचे हप्ते पाडून घेण्याची वेळ उद्भवली असती काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बँकांच्या या अटींमुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठण नकोसे झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. कर्जाचे पुनर्गठण करताना रकमेचे पाच वार्षिक हप्ते पडणार आहेत. यात पहिला कर्जाचा हप्ता जून २०१६ मध्ये शेतकऱ्यांना भरावा लागणार असून पहिल्या वर्षी व्याज लागणार नाही. दुसऱ्या वर्षापासून मात्र व्याज आकारले जाणार आहे. हे व्याज नगण्य असले तरी गहाणखत, सर्च रिपोट या खर्चासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासन, प्रशासन व बँकांनी ही खर्चिक बाब टाळणे गरजेचे झाले आहे.गहाणखत, सर्च रिपोर्टच्या नावावर २० हजारांचा खर्च एखाद्या शेतकऱ्यावर दीड लाख रुपयांचे कर्ज असेल तर त्याला गहाणखत व सर्च रिपोर्टचा खर्च स्वत: करावा लागणार आहे. याचा हिशेब केल्यास सात हजार रुपये गहाण खत खर्च, कागदपत्रांकरिता येणारा अन्य खर्च आणि सर्च रिपोर्टला लागणारा खर्च असा साधारण २० हजारांच्या जवळपास भुर्दंड सोसावा लागतो. शेतकऱ्यांकडे २० हजार रुपये असतील तर तो तेवढ्या पैशात तात्पूरती शेतीची कामे उरकणार नाही काय, कर्ज पुनर्गठणाच्या भानगडीत कशाला पडेल, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करताना दिसतात. बँक नियमाप्रमाणेच पुनर्गठण२०१४-१५ मध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरीच कर्ज पुनर्गठणासाठी पात्र आहेत. त्यापूर्वीचे कर्जदार शेतकरी पात्र नाही. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होणार असून त्यांना नवीन कर्जही उपलब्ध होऊ शकते; पण ही संपूर्ण प्रक्रिया बँकेच्या नियमानुसारच होणार असल्याची लीड बँकेचे देवपुजारी यांनी सांगितले. पीक कर्ज पुनर्गठणाबाबत तक्रारी येत असल्याचेही त्यांनी मान्य केले.