शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पाण्याच्या शोधात चिमणी आणि घुबडाचा तडफडून मृत्यू

By admin | Updated: May 28, 2017 00:24 IST

उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते.

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा अभाव पक्ष्यांच्या जीवावर : सामाजिक संघटनांच्या आवाहनानंतरही स्थिती दयनियच लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते. यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे; पण ते तोकडेच पडत असल्याचे सेलू काटे येथे घडलेल्या घटनेवरून दिसून आले. येथे पाण्याच्या शोधात असलेल्या एका चिमणीसह घुबडाला तहाणेने व्याकूळ होवून तडफडून जीव गमवावा लागला आहे. येथील शेतकऱ्याच्या शेतातील झाडाखाली चिमणी मृतावस्थेत दिसून आली. तर काही अंतरावर दोन दिवसांपूर्वी झाडाच्या कपारीत लपलेले घुबड बाहेर मृतावस्थेत आढळले. हे दोन्ही पक्षी तहाणेने गतप्राण झाल्याचा अंदाज आहे. या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाऱ्याने सर्वांना चांगलेच होरपळून काढल्याने असे प्रकार जिल्ह्यात किती घडले असतील, याचा अंदाज लावणे कठीण आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीची शिकवण देणाऱ्या वर्धेकरांना नव्या जोमाने सुरुवात करण्याची वेळ आल्याचे यावरून जाणवत आहे. केवळ पक्षीच नव्हे तर पाण्याकरिता जंगलातील इतर वन्यप्राण्यांचीही भटकंती होत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे या वन्यप्राणी गावांकडे धावत आहे. ज्या शेतात ओलिताची सोय आहे, अशा शेतात त्यांचा मोर्चा अधिक असतो. या प्राण्यांचे कळप पाण्याच्या शोधात शेतात येत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता या प्रभागातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. चिऊताईकरिता छतावर ठेवलेला दाना अन् पाणी गेले कुठे ? जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक, पक्षी प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून चिऊताईकरिता घराच्या छतावर, बालकणीत पाणी ठेवण्याचा उपक्रम राबवित आहेत. यात अनेकांकडून सहभागी होत असल्याचे सोशल नेटवर्कींगवर अपलोड केलेल्या फोटोवरून दिसत आहे. अशात पक्ष्यांचा पाण्याअभावी जीव गेल्याने अनेकांकडून ठेवण्यात आलेले पाणी अन् दाना गेला तरी कुठे असा, प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे प्रत्येकाने जबाबदारी म्हणून दाना अन् पाणी देत या पक्ष्यांना जपण्याची गरज आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले जंगलात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांवर जंगलातील प्राण्यांची तहाण आहे. हे पाणवठे आटले तरी या प्राण्यांकरिता वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत; पण त्यांच्याकडून या पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने की काय, पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांची धाव परिसरात ओलित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताकडे असते. पाण्यासह या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचीही नासाडी होते. सेलू काटे येथील सुनील हिवंज या शेतकऱ्याच्या शेतात रात्री आणि सकाळच्या प्रहरी हरिण, माकड, रोही, डुक्कर आदी प्राणी बघावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.