शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात चिमणी आणि घुबडाचा तडफडून मृत्यू

By admin | Updated: May 28, 2017 00:24 IST

उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते.

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा अभाव पक्ष्यांच्या जीवावर : सामाजिक संघटनांच्या आवाहनानंतरही स्थिती दयनियच लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते. यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे; पण ते तोकडेच पडत असल्याचे सेलू काटे येथे घडलेल्या घटनेवरून दिसून आले. येथे पाण्याच्या शोधात असलेल्या एका चिमणीसह घुबडाला तहाणेने व्याकूळ होवून तडफडून जीव गमवावा लागला आहे. येथील शेतकऱ्याच्या शेतातील झाडाखाली चिमणी मृतावस्थेत दिसून आली. तर काही अंतरावर दोन दिवसांपूर्वी झाडाच्या कपारीत लपलेले घुबड बाहेर मृतावस्थेत आढळले. हे दोन्ही पक्षी तहाणेने गतप्राण झाल्याचा अंदाज आहे. या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाऱ्याने सर्वांना चांगलेच होरपळून काढल्याने असे प्रकार जिल्ह्यात किती घडले असतील, याचा अंदाज लावणे कठीण आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीची शिकवण देणाऱ्या वर्धेकरांना नव्या जोमाने सुरुवात करण्याची वेळ आल्याचे यावरून जाणवत आहे. केवळ पक्षीच नव्हे तर पाण्याकरिता जंगलातील इतर वन्यप्राण्यांचीही भटकंती होत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे या वन्यप्राणी गावांकडे धावत आहे. ज्या शेतात ओलिताची सोय आहे, अशा शेतात त्यांचा मोर्चा अधिक असतो. या प्राण्यांचे कळप पाण्याच्या शोधात शेतात येत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता या प्रभागातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. चिऊताईकरिता छतावर ठेवलेला दाना अन् पाणी गेले कुठे ? जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक, पक्षी प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून चिऊताईकरिता घराच्या छतावर, बालकणीत पाणी ठेवण्याचा उपक्रम राबवित आहेत. यात अनेकांकडून सहभागी होत असल्याचे सोशल नेटवर्कींगवर अपलोड केलेल्या फोटोवरून दिसत आहे. अशात पक्ष्यांचा पाण्याअभावी जीव गेल्याने अनेकांकडून ठेवण्यात आलेले पाणी अन् दाना गेला तरी कुठे असा, प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे प्रत्येकाने जबाबदारी म्हणून दाना अन् पाणी देत या पक्ष्यांना जपण्याची गरज आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले जंगलात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांवर जंगलातील प्राण्यांची तहाण आहे. हे पाणवठे आटले तरी या प्राण्यांकरिता वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत; पण त्यांच्याकडून या पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने की काय, पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांची धाव परिसरात ओलित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताकडे असते. पाण्यासह या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचीही नासाडी होते. सेलू काटे येथील सुनील हिवंज या शेतकऱ्याच्या शेतात रात्री आणि सकाळच्या प्रहरी हरिण, माकड, रोही, डुक्कर आदी प्राणी बघावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.