शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात चिमणी आणि घुबडाचा तडफडून मृत्यू

By admin | Updated: May 28, 2017 00:24 IST

उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते.

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा अभाव पक्ष्यांच्या जीवावर : सामाजिक संघटनांच्या आवाहनानंतरही स्थिती दयनियच लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते. यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे; पण ते तोकडेच पडत असल्याचे सेलू काटे येथे घडलेल्या घटनेवरून दिसून आले. येथे पाण्याच्या शोधात असलेल्या एका चिमणीसह घुबडाला तहाणेने व्याकूळ होवून तडफडून जीव गमवावा लागला आहे. येथील शेतकऱ्याच्या शेतातील झाडाखाली चिमणी मृतावस्थेत दिसून आली. तर काही अंतरावर दोन दिवसांपूर्वी झाडाच्या कपारीत लपलेले घुबड बाहेर मृतावस्थेत आढळले. हे दोन्ही पक्षी तहाणेने गतप्राण झाल्याचा अंदाज आहे. या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाऱ्याने सर्वांना चांगलेच होरपळून काढल्याने असे प्रकार जिल्ह्यात किती घडले असतील, याचा अंदाज लावणे कठीण आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीची शिकवण देणाऱ्या वर्धेकरांना नव्या जोमाने सुरुवात करण्याची वेळ आल्याचे यावरून जाणवत आहे. केवळ पक्षीच नव्हे तर पाण्याकरिता जंगलातील इतर वन्यप्राण्यांचीही भटकंती होत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे या वन्यप्राणी गावांकडे धावत आहे. ज्या शेतात ओलिताची सोय आहे, अशा शेतात त्यांचा मोर्चा अधिक असतो. या प्राण्यांचे कळप पाण्याच्या शोधात शेतात येत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता या प्रभागातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. चिऊताईकरिता छतावर ठेवलेला दाना अन् पाणी गेले कुठे ? जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक, पक्षी प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून चिऊताईकरिता घराच्या छतावर, बालकणीत पाणी ठेवण्याचा उपक्रम राबवित आहेत. यात अनेकांकडून सहभागी होत असल्याचे सोशल नेटवर्कींगवर अपलोड केलेल्या फोटोवरून दिसत आहे. अशात पक्ष्यांचा पाण्याअभावी जीव गेल्याने अनेकांकडून ठेवण्यात आलेले पाणी अन् दाना गेला तरी कुठे असा, प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे प्रत्येकाने जबाबदारी म्हणून दाना अन् पाणी देत या पक्ष्यांना जपण्याची गरज आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले जंगलात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांवर जंगलातील प्राण्यांची तहाण आहे. हे पाणवठे आटले तरी या प्राण्यांकरिता वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत; पण त्यांच्याकडून या पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने की काय, पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांची धाव परिसरात ओलित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताकडे असते. पाण्यासह या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचीही नासाडी होते. सेलू काटे येथील सुनील हिवंज या शेतकऱ्याच्या शेतात रात्री आणि सकाळच्या प्रहरी हरिण, माकड, रोही, डुक्कर आदी प्राणी बघावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.