शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: May 30, 2016 01:44 IST

मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली.

अंतरगाव येथील घटना : गोठा जाळल्याने घडला अनर्थसमुद्रपूर/गिरड : मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली. यामुळे चुलत भाऊ व त्यांच्या मुलाने संतापून या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. कवडू नारायण चाफले (४५) रा. अंतरगाव असे मृतकाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्याचे नाव विठ्ठल चाफले, रामभाऊ चाफले व सचिन चाफले रा. अंतरगाव असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून विठ्ठल, रामभाऊ व सचिन चाफले या तिघांवर भादंविच्या कलम ३०२, २०१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गिरड पोलीस करीत आहेत. पोलीस सुत्रानुसार, कवडू चाफले याच्याकडे १३ एकर शेती होती; पण त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने तो इतरांना त्रास देत होता. यामुळे गावात त्याची दहशत निर्माण झाली होती. त्याचा हाच त्रास पत्नी निर्मला हिला होत असल्याने गत तीन महिन्यांपासून ती मुलगी व मुलाला घेवून माहेरी हळदगाव येथे गेली होती. यामुळे गावात एकटाच राहत असल्याने त्याचा त्रास वाढला होता. अशात शेतातील त्याची जनावरे मृतावस्थेत दिसल्याने त्याने गावाला लागून असलेला त्याचा चुलत भाऊ विठ्ठल चाफले याच्या गोठ्याला आग लावली. या आगीत गोठ्यामधील स्प्रिंकलर पाईप सेट, इंजिनसह संपूर्ण शेती साहित्य खाक झाले. यात त्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग कवडूने लावल्याचे कळताच विठ्ठल, त्याचा भाऊ रामभाऊ, मुलगा सचिन व काही नागरिकांनी शोधून त्याला मारहाण केली. मारहाण करून त्याला गोठ्याजवळ आणले. घटनेची माहिती गिरड पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कवडूला त्वरित समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर) कवडूविरोधात आठवड्यापूर्वीच पोलिसांत तक्रार कवडू चाफले याच्याकडून त्रास वाढत असल्याने त्याची तक्रार विठ्ठल चाफले याने आठ दिवसांपूर्वीच पोलिसांत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर या प्रकरणी भादंविच्या ४३५ अन्वये गुन्हाही दाखल आहे. गावातील एक सद्गृहस्थ म्हणून विठ्ठलची ओळख असल्याचे गावकरी बोलत आहेत. कवडू मनोरुग्ण असून विठ्ठलच १५ वर्षांपासून त्याच्यावर औषधोपचार करीत असल्याची माहिती आहे.