शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: May 30, 2016 01:44 IST

मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली.

अंतरगाव येथील घटना : गोठा जाळल्याने घडला अनर्थसमुद्रपूर/गिरड : मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली. यामुळे चुलत भाऊ व त्यांच्या मुलाने संतापून या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. कवडू नारायण चाफले (४५) रा. अंतरगाव असे मृतकाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्याचे नाव विठ्ठल चाफले, रामभाऊ चाफले व सचिन चाफले रा. अंतरगाव असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून विठ्ठल, रामभाऊ व सचिन चाफले या तिघांवर भादंविच्या कलम ३०२, २०१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गिरड पोलीस करीत आहेत. पोलीस सुत्रानुसार, कवडू चाफले याच्याकडे १३ एकर शेती होती; पण त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने तो इतरांना त्रास देत होता. यामुळे गावात त्याची दहशत निर्माण झाली होती. त्याचा हाच त्रास पत्नी निर्मला हिला होत असल्याने गत तीन महिन्यांपासून ती मुलगी व मुलाला घेवून माहेरी हळदगाव येथे गेली होती. यामुळे गावात एकटाच राहत असल्याने त्याचा त्रास वाढला होता. अशात शेतातील त्याची जनावरे मृतावस्थेत दिसल्याने त्याने गावाला लागून असलेला त्याचा चुलत भाऊ विठ्ठल चाफले याच्या गोठ्याला आग लावली. या आगीत गोठ्यामधील स्प्रिंकलर पाईप सेट, इंजिनसह संपूर्ण शेती साहित्य खाक झाले. यात त्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग कवडूने लावल्याचे कळताच विठ्ठल, त्याचा भाऊ रामभाऊ, मुलगा सचिन व काही नागरिकांनी शोधून त्याला मारहाण केली. मारहाण करून त्याला गोठ्याजवळ आणले. घटनेची माहिती गिरड पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कवडूला त्वरित समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर) कवडूविरोधात आठवड्यापूर्वीच पोलिसांत तक्रार कवडू चाफले याच्याकडून त्रास वाढत असल्याने त्याची तक्रार विठ्ठल चाफले याने आठ दिवसांपूर्वीच पोलिसांत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर या प्रकरणी भादंविच्या ४३५ अन्वये गुन्हाही दाखल आहे. गावातील एक सद्गृहस्थ म्हणून विठ्ठलची ओळख असल्याचे गावकरी बोलत आहेत. कवडू मनोरुग्ण असून विठ्ठलच १५ वर्षांपासून त्याच्यावर औषधोपचार करीत असल्याची माहिती आहे.