शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:54 IST

सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पंचनामे करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आला आहे. त्यांचे कृषी विभागानी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा अशा सूचना वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी शेतकरी समस्या आढावा बैठकीत केल्या.सध्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आलेला असल्यामुळे शेतकºयांचे यामुळे बरेच नुकसान होत आहे. त्यामुळे तिवारी यांनी तातडीने बैठक घेऊन बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोरे, कापसे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, मार्केटींग फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.फवारणी दरम्यान विष बाधित झालेल्या प्रकरणात किटनाशक औषधी विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बाधित झाले. त्या शेतकºयांना किटकनाशकाची भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे किटकनाशक खरेदीचे देयक नसल्यास त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावे अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देऊन नवीन पीक कर्ज देणे आवश्यक आहे. पीक कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत जमा करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात सोयाबीन व कापूस समाधानकारक असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्युत विभागाने शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज देयक असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये अशा सूचना विद्युत विभागाला केल्या. यावेळी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा, शेतकरी अन्नसुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या याचाही आढावा घेतला.किशोर तिवारी यांनी यावेळी विविध विषयांवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मात्र देवळी तालुक्यात बोंड अळी प्रकरणी बियाणे कंपन्यांवर नोंदविलेल्या अदखलपात्र गुन्ह्याबाबात कुठलीही चर्चा केली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत सर्वच उदासीन असल्याचे यातून पुन्हा एकदा दिसून आले.