शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:54 IST

सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पंचनामे करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आला आहे. त्यांचे कृषी विभागानी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा अशा सूचना वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी शेतकरी समस्या आढावा बैठकीत केल्या.सध्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आलेला असल्यामुळे शेतकºयांचे यामुळे बरेच नुकसान होत आहे. त्यामुळे तिवारी यांनी तातडीने बैठक घेऊन बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोरे, कापसे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, मार्केटींग फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.फवारणी दरम्यान विष बाधित झालेल्या प्रकरणात किटनाशक औषधी विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बाधित झाले. त्या शेतकºयांना किटकनाशकाची भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे किटकनाशक खरेदीचे देयक नसल्यास त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावे अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देऊन नवीन पीक कर्ज देणे आवश्यक आहे. पीक कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत जमा करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात सोयाबीन व कापूस समाधानकारक असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्युत विभागाने शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज देयक असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये अशा सूचना विद्युत विभागाला केल्या. यावेळी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा, शेतकरी अन्नसुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या याचाही आढावा घेतला.किशोर तिवारी यांनी यावेळी विविध विषयांवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मात्र देवळी तालुक्यात बोंड अळी प्रकरणी बियाणे कंपन्यांवर नोंदविलेल्या अदखलपात्र गुन्ह्याबाबात कुठलीही चर्चा केली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत सर्वच उदासीन असल्याचे यातून पुन्हा एकदा दिसून आले.