शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंतप्रधान पीक विमा योजना ऐच्छिक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:47 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजना बदलवून पंतप्रधान हे आकर्षक बदलवून केंद्र सरकारने गत दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान पीक योजना सुरू केली. लहान-सहान नुकसानासाठी भरीव मदत मिळेल असा गाजावाजा केला. परंतु, अनेकांना नुकसानीपोटी आर्थिक मदत कंपन्यांनी दिली नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच फायदा

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : हवामानावर आधारित पीक विमा योजना बदलवून पंतप्रधान हे आकर्षक बदलवून केंद्र सरकारने गत दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान पीक योजना सुरू केली. लहान-सहान नुकसानासाठी भरीव मदत मिळेल असा गाजावाजा केला. परंतु, अनेकांना नुकसानीपोटी आर्थिक मदत कंपन्यांनी दिली नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, पंतप्रधान पीक योजना ऐच्छिक करा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची आहे.कुठलेही जिल्हाधिकारी कृषी खात्यातील अधिकाºयांनी योजनेची वकीली करतात. देशात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजना बंधनकारक केली; पण दोन वर्षांतील आकडेवारी पाहता योजना शेतकऱ्यांना फायदेशी होण्यापेक्षा खासगी विमा कंपन्यांनाच फायदा देणारी ठरत आहे. म्हणून सदर योजना ऐच्छीक असावी अशी मागणी होत आहे. वादळ, वारा, पाऊस पावसाचा अतीताण नैसर्गिक आपत्ती या कारणाने शेत पिकांचे नुकसान झाल्यास सहज व विनासावास नुकसान भरपाई मिळेल अशी आशा दाखवत जूनी पीक विमा योजना बदलवून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांना योजना फायदेशीर आहे हे पटवून देण्यासाठी जाहीरातीवर मोठा खर्चही करण्यात आला. शिवाय कृषीसह जिल्हा प्रशासनातील महसूल विभागानेही शेतकऱ्यांना सदर योजना कशी फायद्याची आहे हे पटवून दिले. जे शेतकरी बँकतून पीक कर्ज घेतात अशा शेतकºयांकडून बँकांनी विम्याचा हप्ता परस्पर कापून घेतले. तर कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी नगदी स्वरूपात बँकांमध्ये हप्ता भरला; पण गत दोन वर्षांतील खरीप व रब्बी हंगामातील अनुभव लक्षात घेता ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरण्याऐवजी कंपनीच्याच फायद्याची ठरत असल्याचे दिसते. प्रत्येक जिल्ह्यातून पीक विम्याच्या नावाखाली सदर खासगी विमा कंपन्यांनी सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांची अप्रत्यक्ष आर्थिक पिळवणूकच केली. शिवाय कोट्यावधीची माया गोळा केल्याने ती ऐच्छिक करण्याची मागणी आहे.सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात या योजनेच्या माध्यमातून बॅँकांनी विम्याचा हप्ता म्हणून शेतकऱ्यांकडून २६०० कोटी कापून घेतले. तर वर्ष अखेरीस कंपन्यांनी शेतकऱ्यांना १४०० कोटी पेक्षा कमी रुपयाची नुकसान भरपाई वाटप केली. एकूणच विमा कंपन्यांना १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा फायदा झाल्याचे माहिती अधिकाराने उघड झाले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाCrop Loanपीक कर्ज