शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

उत्सुकता शिगेला, जि.प. व पं.स.ची आज आरक्षण सोडत

By admin | Updated: October 5, 2016 01:39 IST

जिल्ह्यात नवरात्रोत्सवासह राजकीय रंगही चढत असल्याचे मंगळवारी दिसून आले.

जिल्हा परिषदेत ५१ ऐवजी ५२ गट : नगरपंचायत झालेल्या गट व गणांचा फटका कुणाला, नव्या गट-गणात कुणाचे भाग्य, याकडे अनेकांचे लक्ष वर्धा: जिल्ह्यात नवरात्रोत्सवासह राजकीय रंगही चढत असल्याचे मंगळवारी दिसून आले. येत्या वर्षात जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीकरिता बुधवारी आरक्षण सोडत आहे. यामुळे येत्या पंचवार्षिकेत आपली जागा राहते किंवा ती जाते याकडे जिल्ह्यातील आजी माजी दिग्गजांचे लक्ष लागले आहे. गत दोन पंचवार्षिकतेचे आरक्षण घेत त्याचे गणित लावून आपले आरक्षण कायम राहावे, याकरिता अनेकांनी देव पाण्यात टाकले. यात ते तरणार अथवा त्यांच्या इच्छा आकांशांवर पाणी फेरले जाणार याचा फैसला बुधवारीच होणार आहे. सध्या असलेल्या गटा-गणातून आपले आरक्षण गेल्यास दुसऱ्या गट-गणातून जुगाड जमविण्याबाबतही अनेकांची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. शिवाय जिल्ह्यात यंदा आष्टी (शहीद), कारंजा (घाडगे), समुद्रपूर व सेलू हे चार जि.प. गट नगरपंचायत झाले. यामुळे जिल्हा परिषदेत गटांची संख्या कमी होणार असे भाकीत असताना यात वाढ झाली आहे. आतापर्यंत ५१ सदस्यांचे असलेले मिनी मंत्रालय येत्या निवडणुकीपासून ५२ सदस्यांचे होणार आहे. यात नगरपंचायत झालेल्या सेलू येथील गटाची जागा सुकळी (स्टेशन), समुद्रपूर येथील जागा जाम तर आष्टी (शहीद) व कारंजा (घाडगे) येथील जागा रद्द झाल्या. तर वर्धा तालुक्यात जिल्हा परिषदेचे वरूड, म्हसाळा व सालोड (हिरापूर) असे तीन नवे गट निर्माण होणार असल्याची चर्चा अधिकारी वर्गात आहे. यावर आरक्षण सोडतीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या गट व गणांकडे आजी माजी दिग्गजांचे लक्ष असून तिथे आपले जमेल काय, असेही गणित त्यांच्याकडून मांडण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात दिसून आले. हिच स्थिती पंचायत समिती गणाची आहे. येथेही आता सदस्य संख्या १०२ ऐवजी १०४ झाली आहे. या सदस्यांचेही आरक्षण बुधवारी जाहीर होणार आहे. आपल्या गणात आपली जागा कायम राहते अथवा नाही याकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तर काही ठिकाणी गणित बिघडलेल्या जुन्यांनी यंदा आपली लॉटरी लागणार असल्याची भाकीते मांडली आहेत. त्यांची भाकीते खरी ठरतात अथवा यंदाही त्यांची निराशाच होते याकडे अनेकांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील संभाव्य पाच नवे गट व गणजिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू व समुद्रपूर गट नगरपंचायतीत परीवर्तीत झाले. यामुळे या चार गटातील व गणातील सदस्यांचे काय, असा प्रश्न साऱ्यांना पडला. त्यांची जागा कायम राहते किंवा ते रद्द होते याकडे जिल्ह्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे. आष्टी व कारंजा येथील पद रद्द झाले असून या क्षेत्रातील सदस्य संख्या घटली आहे. आष्टी येथे आता चार ऐवजी तीन तर कारंजा येथे पाच ऐवजी चार गट राहणार आहे. तर सेलू येथील गट सुकळी (स्टेशन) आणि समुद्रपूर येथील गट जाम येथे तर वर्धा तालुक्यात सालोड, वरूड आणि म्हसाळा या तीन नव्या गटामुळे ११ ऐवजी १४ गट राहणार असल्याची माहिती आहे. गटांचे आरक्षण विकास भवनात जिल्हा परिषद गटाचे बुधवारी निघणारे आरक्षण विकास भवनात काढण्यात येणार आहे. विकास भवनात कोणाची जागा कायम राहते व कोणाचे गणित बिघडते याचा खुलासा होणार आहे. यामुळे आपले आरक्षण कायम रहावे याकरिता अनेकांनी देव पाण्यात टाकले आहे. यात कोणाच्या आशांवर पाणी फेरले जाते व कोणाची जागा टिकते हे बुधवारी समोर येईलच. आठही गणाच्या आरक्षणाची सोडत पंचायत समिती स्तरावर होणार आहे. येथेही अनेकांच्या येत्या पंचवार्षिकीचे भविष्य ठरणार आहे. येथेही विद्यमानांसह माजी दिग्गजांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे.