शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

‘क्लीन अप वर्धाला’ अस्वच्छतेचा शाप

By admin | Updated: February 9, 2015 23:17 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनला ‘ओ’ देत वर्धा शहरातही प्रशासनाने ‘क्लीन अंप’ नावाखाली ‘स्वच्छ वर्धा अभियान’ सुरू केले़ प्रजासत्ताक दिन व त्यानंतर महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारी

स्वच्छ सुंदर वर्धा अभियानाचा बोजवारा : फोटोपुरती ठरली मोहीम; शहराच्या गल्लीबोळात कचरावर्धा : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनला ‘ओ’ देत वर्धा शहरातही प्रशासनाने ‘क्लीन अंप’ नावाखाली ‘स्वच्छ वर्धा अभियान’ सुरू केले़ प्रजासत्ताक दिन व त्यानंतर महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारी या स्मृतिदिनी वर्धा शहरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली; पण त्यानंतर स्वच्छ वर्धा अभियानाचा बोजवाराच उडालेला दिसतो़ शहरातील कचऱ्याचे ढोले भरलेले, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगार, नाल्या तुंबलेल्या ही स्थिती अभियानाच्या १२ दिवसानंतरही कायम दिसून आली़ यावरून स्वच्छ वर्धा अभियान केवळ फोटो काढण्यापूरतेच तर मर्यादित नव्हते ना, असा संशय व्यक्त होत आहे़ जिल्हा प्रशासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रजासत्ताक दिनापासून स्वच्छ वर्धा अभियानास प्रारंभ करण्यात आला़ मान्यवरांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करून हातात खराटे घेऊन कचऱ्यावर उभे राहुन फोटो काढण्याचे सोपस्कारही पार पाडण्यात आले़ यानंतर ३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी या अभियानाचा जोर शहरात पाहावयास मिळाला़ २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या स्वच्छ वर्धा अभियानाचे सातत्य कायम राहिल, अशी जनतेला अपेक्षा होती; पण ती १२ दिवसांतच फोल ठरली़ ‘क्लीन अप’ असे फलक हाती घेऊन स्वच्छ वर्धा अभियान सुरू करण्यात आले़ या अभियानासाठी अन्य ठिकाणीही फलक रोवण्यात आलेत; पण किती स्वच्छता केली, हा संशोधनाचा विषय ठरत आहे़ शहरातील बजाज चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर रोटरी क्लब, युवा शक्ती व अन्य विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून नाल्या साफ केल्या होत्या़ या स्वच्छ केलेल्या नाल्या पुन्हा तुंबल्या आहेत़ भाजी बाजार परिसरात नालीच्या काठावर ‘क्लीन अप’ हा फलकही लावण्यात आला; पण सध्या त्या फलकाजवळच कचरा व घाणीचे साम्राज्य आहे़ ती नाली सांडपाण्याने तुंंबली असून परिसरात दुर्गंधीही पसरली आहे़ असाच प्रकार बाजार ओळींतही पाहावयास मिळतो़ कचऱ्याचे ढोले आहेत़ ढोल्यात कमी तर त्याच्या अवतीभवतीच अधिक कचरा दिसून येतो़ ढोल्यामध्ये कचरा जाळला जात असल्याने तेही निकामी होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ हा प्रकार केवळ शहरातच दिसतो, असे नव्हे तर प्रशासकीय कार्यालये असलेल्या परिसरातही स्वच्छ वर्धा अभियानानंतर फारशी स्वच्छता दिसत नाही, हे वास्तव आहे़ प्रशासकीय अधिकारी, मान्यवरांच्या साक्षीने सुरू झालेल्या या अभियानाचा बारा दिवसांतच बोजवारा उडाल्याचे यावरून दिसते़ उद्घाटनापूरतेच अभियान राबविले जात असल्याच्या प्रतिक्रीया सामान्यांतून उमटत आहेत़ कुठे रस्त्याच्या कडेला तर कुठे भिंतीच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)