शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खरिपात ४.२८ हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी कृषीला बळकट करण्याचे नियोजन शासन व प्रशासन स्तरावर केले जात आहे. तसे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अंदाज : कोरोनाच्या सावटात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या लॉकडाऊनमधून शेतीशेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. संपूर्ण भारत देत कोरोनामुक्त होण्यासाठी आणखी काही महिने लागतील असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या याच सावटात यंदा खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची तसेच कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी कृषीला बळकट करण्याचे नियोजन शासन व प्रशासन स्तरावर केले जात आहे. तसे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीपात वर्धा जिल्ह्यात एकूण ४ लाख २८ हजार ५२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार २०० हेक्टरवर भूईमुंग, ६५ हजार हेक्टरवर तूर, ८०० हेक्टरवर उडीद, १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. तसे प्राथमिक नियोजनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.बोगस बियाण्यांवर राहणार करडी नजरकुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात बिगस बियाण्यांचा शिरकाव होऊ नये म्हणून कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय प्रभावी अंमलबजावणीही केली जाणार आहे.१.२३ लाख खतांच्या आवंटनाला मंजूरीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध खतांची कमतरता भासू नये म्हणून नियोजन करून ७९ हजार मेट्रीक टन खताची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर १ लाख २३ हजार मेट्रीक टन खत वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याच्या आवंटनाला शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. मंजूर झालेले खत टप्प्या टप्प्याने वर्धा जिल्ह्याला मिळणार आहे.चार हजार क्विंटल तुरीचे बियाणे मिळणारवर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात. तुरीचे क्षेत्र घटू नये शिवाय शेतकºयांनाही वेळीच तुरीचे बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार केला आहे. शिवाय तो शासनाला सादर केला आहे. त्यानुसार ४ हजार क्विंटल तुरीचे बियाणे वर्धा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.सोयाबीनचेही बियाणे वेळीच मिळणारसध्या उन्हाळवाहीच्या कामांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. उन्हाळवाहीची कामे पूर्ण होत पावसाला सुरूवात होताच शेतकरी बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी धाव घेणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून यंदा वर्धा जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणार आहे.११ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची केली मागणीवर्धा जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी शासनाकडे नोदविली होती. त्यानंतर शासनाच्या मध्यस्तीअंती १९ लाख कापूस बियाण्यांचे पाकिट वर्धा जिल्ह्याला देण्याचा होकार सिडस् कंपन्यांनी दर्शविला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस