शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

खरिपात ४.२८ हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी कृषीला बळकट करण्याचे नियोजन शासन व प्रशासन स्तरावर केले जात आहे. तसे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अंदाज : कोरोनाच्या सावटात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या लॉकडाऊनमधून शेतीशेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. संपूर्ण भारत देत कोरोनामुक्त होण्यासाठी आणखी काही महिने लागतील असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या याच सावटात यंदा खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची तसेच कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी कृषीला बळकट करण्याचे नियोजन शासन व प्रशासन स्तरावर केले जात आहे. तसे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीपात वर्धा जिल्ह्यात एकूण ४ लाख २८ हजार ५२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार २०० हेक्टरवर भूईमुंग, ६५ हजार हेक्टरवर तूर, ८०० हेक्टरवर उडीद, १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. तसे प्राथमिक नियोजनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.बोगस बियाण्यांवर राहणार करडी नजरकुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात बिगस बियाण्यांचा शिरकाव होऊ नये म्हणून कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय प्रभावी अंमलबजावणीही केली जाणार आहे.१.२३ लाख खतांच्या आवंटनाला मंजूरीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध खतांची कमतरता भासू नये म्हणून नियोजन करून ७९ हजार मेट्रीक टन खताची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर १ लाख २३ हजार मेट्रीक टन खत वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याच्या आवंटनाला शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. मंजूर झालेले खत टप्प्या टप्प्याने वर्धा जिल्ह्याला मिळणार आहे.चार हजार क्विंटल तुरीचे बियाणे मिळणारवर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात. तुरीचे क्षेत्र घटू नये शिवाय शेतकºयांनाही वेळीच तुरीचे बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार केला आहे. शिवाय तो शासनाला सादर केला आहे. त्यानुसार ४ हजार क्विंटल तुरीचे बियाणे वर्धा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.सोयाबीनचेही बियाणे वेळीच मिळणारसध्या उन्हाळवाहीच्या कामांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. उन्हाळवाहीची कामे पूर्ण होत पावसाला सुरूवात होताच शेतकरी बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी धाव घेणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून यंदा वर्धा जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणार आहे.११ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची केली मागणीवर्धा जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी शासनाकडे नोदविली होती. त्यानंतर शासनाच्या मध्यस्तीअंती १९ लाख कापूस बियाण्यांचे पाकिट वर्धा जिल्ह्याला देण्याचा होकार सिडस् कंपन्यांनी दर्शविला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस