शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

निकृष्ट सिमेंट खांब; वीज वाहिनीला धोका

By admin | Updated: February 4, 2015 23:19 IST

ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात

अमोल सोटे - आष्टी (श़)ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात नसल्याने या प्रवाहित वीजवाहिन्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत़ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ आर्वी विभागांतर्गत, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा, पुलगाव असे उपविभाग आहे. या सर्व विभागात नवीन व जुन्या वीज वाहिन्या दुरूस्तीचे काम धडाक्यात सुरू आहे. यासाठी सिमेंटचे खांब वापरले जात आहे. खांबांमध्ये सळाखी कमी आणि गिट्टी अधिक असल्याने अनेक खांब अर्ध्यातून तुटत आहेत़ काही ठिकाणी ते वाकल्याचे दिसते़ जमिनीत खोलवर खोदून त्यात मजबूत व दर्जेदार काँक्रीट ५ फुटापर्यंत करावे लागते. संबंधित यंत्रणा अवघ्या दीड फुटाचे काँक्रीट करून खांब गाडत आहे. यात लाखो रुपयांचा गैरप्रकार होत आहे. या कामाची सर्व बिले मुकाट्याने पारित होतात, हे विशेष! आर्वी विभागातील बेताल व भोंगळ कारभार निकृष्ट कामांना मुकसंमती देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आष्टी तालुक्यातील साहूर, अंतोरा परिसरात सर्वाधिक बोगस काम दिसून येते़ आर्वी तालुक्यातील वाठोडा पुनर्वसन लगतच्या भागातील लाखो रुपयांचे काम संशयाच्या भोवऱ्यात आहे. वीज वितरण कंपनी अस्तित्वात नसलेल्या कामांची नोंद मोजमाप पुस्तिकेत करीत आहे. यात तांत्रिक तपासणी विभागातील एक कनिष्ठ अभियंता पार्टनर असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचे काम संबंधित अधिकारी करीत असून योजनांची वाट लावत आहे़