शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सात-बारावर स्वतः करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी ॲप’ सुरू केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाइलच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद कशी करावी, याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वतः बरबडी येथे जावून शेतकऱ्यांना करून दाखवले. जिल्हाधिकारी थेट शेतापर्यंत आल्याने बरबडी येथील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्यच संचारल्याचे बघावयास मिळाले.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. १३ ऑगस्टला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे ॲप कार्यान्वित करण्यात आले असून, ॲपबाबत शेतकऱ्यांना नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या समस्या जाणवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथे सोनोबा गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात जात शेतातील पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमध्ये करून दाखवली. शेतात टमाटर, वांगी आणि दोडके या पिकाची नोंद घेण्यासोबतच त्यांच्या शेतातील सिंचन सुविधेचीसुद्धा नोंद ॲप मध्ये करून दिली. तसेच प्रभाकर लेंडे या शेतकऱ्याच्या शेताचीही पाहणी करून ॲपमध्ये उभ्या पिकाची नोंद करण्यात आली. यावेळी बरबडीच्या सरपंच संगीता शिंदे, उपविभागीय महसूल  अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत आदींची उपस्थिती होती.ॲप शेतकऱ्यांकरिता अतिशय सोपेचई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अतिशय सोपे असून, यामध्ये शेतकरी कधीही त्यांच्या खरीप, रबी व उन्हाळी पिकाची नोंद घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

एका मोबाईलद्वारे २० शेतकऱ्यांच्या पिकाची घेता येते नोंदएका मोबाईलवरून २० शेतकऱ्यांची पिकाची  नोंद घेता येते. त्यामुळे ॲण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइलवरून  इतर शेतकऱ्यांच्या पिकाची  नोंद करून देण्यासाठी पुढाकार घेण्यासोबतच तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्यात.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती