शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

३४,४५९ शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता.

ठळक मुद्दे६.९५ कोटींची भरली रक्कम : ३९ हजार ५५५ हेक्टरवरील पिकाला संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाची अवकृपा झाल्यास झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले आहे. सदर शेतकºयांनी नगदी पिकासाठी ५ टक्के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकांसाठी २ टक्के अशी एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये पीक संरक्षीत रक्कम म्हणून भरली आहे. एकूणच ३९ हजार ५५५.२१२ हेक्टर वरील पिकांना विम्याचे कवच यंदा देण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता. त्याचाच परिणाम यंदा सुरूवातीला पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत दिसून आला. सुरूवातीला शेतकऱ्यांनीही पीक विमा काढण्याच्या विषयाकडे पाठच दाखविण्यात धन्यता मानली होती. परंतु, नंतर पीक विमा काढणाऱ्यांचा आकडा कासवगतीने का होईना पण वाढला. यंदा खरीप हंगामात एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.४२७.८३ हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका२६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा एकूण ४२७.८३ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १६२.९८ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्या आत तर २६४.८५ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.यंदा भारतीय कृषी विमा कंपनी देणार नुकसान भरपाईगत वर्षी खरीपात झालेल्या नुकसानीची भरपाई इक्को टोकीयो या विमा कंपनीने पीक विम्याचे कवच घेतलेल्या शेतकऱ्यांना दिली होती. तर यंदाच्या वर्षी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हिच विमा कंपनी पीक विमा काढलेल्या शेतकºयांना देणार आहे.व्यक्तिगत तक्रार करण्यात आर्वी तालुका पुढेसोयाबीन, तूर आणि कपाशी उत्पादकांचे परतीच्या पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. काही शेतकºयांनी झालेल्या नुकसानीबाबत थेट कृषी विभागाला तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ८७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात सर्वाधिक तक्रारी आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी विभागाने या तक्रारींचे दोन गटात विभागणी केली असून कापणीपूर्व गटात ४६ तर कापणी पश्चात गटात ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाने केल्याचे सांगण्यात आले.परतीच्या पावसाने ६१४ शेतकऱ्यांची वाढविली अडचणयंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली. २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे ६१४ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणीवादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभाग आणि विमा कंपनीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी घायतिडक तसेच तहसीलदारांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शेतकरी अशोक नागतोडे, भिमराव भगत, ज्ञानबा ढोले, गणेश राऊत, घनश्याम भूरे यांच्याशी संवाद साधला. शिवाय त्यांच्या शेताची पाहणी केली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा