शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

३४,४५९ शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता.

ठळक मुद्दे६.९५ कोटींची भरली रक्कम : ३९ हजार ५५५ हेक्टरवरील पिकाला संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाची अवकृपा झाल्यास झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले आहे. सदर शेतकºयांनी नगदी पिकासाठी ५ टक्के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकांसाठी २ टक्के अशी एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये पीक संरक्षीत रक्कम म्हणून भरली आहे. एकूणच ३९ हजार ५५५.२१२ हेक्टर वरील पिकांना विम्याचे कवच यंदा देण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात होता. त्याचाच परिणाम यंदा सुरूवातीला पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत दिसून आला. सुरूवातीला शेतकऱ्यांनीही पीक विमा काढण्याच्या विषयाकडे पाठच दाखविण्यात धन्यता मानली होती. परंतु, नंतर पीक विमा काढणाऱ्यांचा आकडा कासवगतीने का होईना पण वाढला. यंदा खरीप हंगामात एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.४२७.८३ हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका२६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा एकूण ४२७.८३ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. १६२.९८ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्या आत तर २६४.८५ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.यंदा भारतीय कृषी विमा कंपनी देणार नुकसान भरपाईगत वर्षी खरीपात झालेल्या नुकसानीची भरपाई इक्को टोकीयो या विमा कंपनीने पीक विम्याचे कवच घेतलेल्या शेतकऱ्यांना दिली होती. तर यंदाच्या वर्षी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हिच विमा कंपनी पीक विमा काढलेल्या शेतकºयांना देणार आहे.व्यक्तिगत तक्रार करण्यात आर्वी तालुका पुढेसोयाबीन, तूर आणि कपाशी उत्पादकांचे परतीच्या पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. काही शेतकºयांनी झालेल्या नुकसानीबाबत थेट कृषी विभागाला तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ८७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात सर्वाधिक तक्रारी आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी विभागाने या तक्रारींचे दोन गटात विभागणी केली असून कापणीपूर्व गटात ४६ तर कापणी पश्चात गटात ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाने केल्याचे सांगण्यात आले.परतीच्या पावसाने ६१४ शेतकऱ्यांची वाढविली अडचणयंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली. २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे ६१४ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणीवादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभाग आणि विमा कंपनीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी घायतिडक तसेच तहसीलदारांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शेतकरी अशोक नागतोडे, भिमराव भगत, ज्ञानबा ढोले, गणेश राऊत, घनश्याम भूरे यांच्याशी संवाद साधला. शिवाय त्यांच्या शेताची पाहणी केली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा