शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी!

By महेश सायखेडे | Updated: July 16, 2023 21:47 IST

१६ दिवसांतील स्थिती : कर्जदार अन् बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक

महेश सायखेडे, वर्धा: जिल्ह्यात एकूण २.४९ लाख शेतकरी खातेदार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ३० हजार ७१७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. यंदा पीक विमा योजनेत काही बदल करण्यात आले असले, तरी मागील १६ दिवसांत जिल्ह्यातील केवळ १२.३४ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतल्याचे वास्तव आहे.

पावसाचा खंड, अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस आदी आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच मोठे नुकसान होते. अशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी क्रमप्राप्त करण्यात आली होती. पण विरोध झाल्याने कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी संबंधित योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. ३१ जुलै ही पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या नोंदणीची अंतिम मुदत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १२.३४ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले.

३.५९ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड

यंदा खरीप हंगामात किमान ४ लाख ११ हजार ९३६ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ९५ हेक्टरवर तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड झाली आहे. त्याबाबतची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

एक रुपयात घेता येते विमा कवच

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पिकांना विमा कवच घेता येते. तसे बदल यंदाच्या वर्षी राज्य शासनाने केले आहेत.

७२ तासांत द्यावी लागते माहिती

एक रुपयात विमा उतरविल्यानंतर नुकसान झाल्यास झालेल्या नुकसानाची माहिती संबंधित शेतकऱ्याने ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक किंवा संबंधित बँक, कृषी व महसूल विभागाला देणे क्रमप्राप्त आहे. वर्धा जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला पीक विम्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.

२४ तासांत ५,०९८ शेतकऱ्यांची नोंदणी

रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३० हजार ७१७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. तर मागील २४ तासांत ५,०९८ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नाेंदणी केल्याचे सांगण्यात आले.ग्राफ २४ तासांतील कामात हिंगणघाट तालुका राहिला पुढे

  • आर्वी : ४७४
  • आष्टी : ३५३
  • देवळी : ७४३
  • हिंगणघाट : ९७५
  • कारंजा : ७७१
  • समुद्रपूर : ५५९
  • सेलू : ४५३
  • वर्धा : ७७०
  • पाॅईंट
  • तालुकानिहाय पीक विम्याच्या नोंदणीची स्थिती
  • तालुका : खातेदार शेतकरी : नोंदणी केलेले शेतकरी
  • आर्वी : २९,९९० : ३,४२२
  • आष्टी : १८,४५७ : १,९३६
  • देवळी : ३३,४४२ : ५,८८८
  • हिंगणघाट : ४०,०८९ : ४,६५६
  • कारंजा : २६,९९७ : ४,६६८
  • समुद्रपूर : ३८,१७० : ३,२३०
  • सेलू : २८,०८३ : २,९५९
  • वर्धा : ३३,९३४ : ४,०१२

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचे कवच घेता येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ४९ हजार १६२ शेतकरी खातेधारक आहेत. त्यापैकी ३० हजार ७७१ शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पीक विम्यासाठी नाेंदणी केली आहे. -प्रभाकर शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी