शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी!

By महेश सायखेडे | Updated: July 16, 2023 21:47 IST

१६ दिवसांतील स्थिती : कर्जदार अन् बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक

महेश सायखेडे, वर्धा: जिल्ह्यात एकूण २.४९ लाख शेतकरी खातेदार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ३० हजार ७१७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. यंदा पीक विमा योजनेत काही बदल करण्यात आले असले, तरी मागील १६ दिवसांत जिल्ह्यातील केवळ १२.३४ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतल्याचे वास्तव आहे.

पावसाचा खंड, अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस आदी आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच मोठे नुकसान होते. अशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी क्रमप्राप्त करण्यात आली होती. पण विरोध झाल्याने कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी संबंधित योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. ३१ जुलै ही पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या नोंदणीची अंतिम मुदत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १२.३४ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले.

३.५९ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड

यंदा खरीप हंगामात किमान ४ लाख ११ हजार ९३६ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ९५ हेक्टरवर तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड झाली आहे. त्याबाबतची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

एक रुपयात घेता येते विमा कवच

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पिकांना विमा कवच घेता येते. तसे बदल यंदाच्या वर्षी राज्य शासनाने केले आहेत.

७२ तासांत द्यावी लागते माहिती

एक रुपयात विमा उतरविल्यानंतर नुकसान झाल्यास झालेल्या नुकसानाची माहिती संबंधित शेतकऱ्याने ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक किंवा संबंधित बँक, कृषी व महसूल विभागाला देणे क्रमप्राप्त आहे. वर्धा जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला पीक विम्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.

२४ तासांत ५,०९८ शेतकऱ्यांची नोंदणी

रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३० हजार ७१७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. तर मागील २४ तासांत ५,०९८ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नाेंदणी केल्याचे सांगण्यात आले.ग्राफ २४ तासांतील कामात हिंगणघाट तालुका राहिला पुढे

  • आर्वी : ४७४
  • आष्टी : ३५३
  • देवळी : ७४३
  • हिंगणघाट : ९७५
  • कारंजा : ७७१
  • समुद्रपूर : ५५९
  • सेलू : ४५३
  • वर्धा : ७७०
  • पाॅईंट
  • तालुकानिहाय पीक विम्याच्या नोंदणीची स्थिती
  • तालुका : खातेदार शेतकरी : नोंदणी केलेले शेतकरी
  • आर्वी : २९,९९० : ३,४२२
  • आष्टी : १८,४५७ : १,९३६
  • देवळी : ३३,४४२ : ५,८८८
  • हिंगणघाट : ४०,०८९ : ४,६५६
  • कारंजा : २६,९९७ : ४,६६८
  • समुद्रपूर : ३८,१७० : ३,२३०
  • सेलू : २८,०८३ : २,९५९
  • वर्धा : ३३,९३४ : ४,०१२

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचे कवच घेता येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ४९ हजार १६२ शेतकरी खातेधारक आहेत. त्यापैकी ३० हजार ७७१ शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पीक विम्यासाठी नाेंदणी केली आहे. -प्रभाकर शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी