शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दुबार पेरण्या संकटात

By admin | Updated: July 23, 2014 23:45 IST

अपुऱ्या पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत होताच पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, दुबार पेरण्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

समुद्रपूर : अपुऱ्या पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत होताच पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, दुबार पेरण्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.समुद्रपूर तालुक्यात अपुऱ्या पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोमवारी ला झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला. दरम्यान खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत झाल्या. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्यात आलेल्या तुरळक पावसात कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतात टाकलेले बियाणे करपले. या स्थितीची कृषी विभागाकडून दखल घेण्यात आली असून, याबाबत अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी दिली. परंतु पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचे दुबार पेरण्या संकटात सापडलेल्या आहे.पावसाने खंड न दिल्यास अंकूरणारे बीज जमिनीतच सडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढावले जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात २६४ मिलीमिटर पाऊस झाला आहे. सतत पाऊस असल्याने शेतीचे कामे ठप्प पडली असून शेतात तन वाढू लागले आहे. दुबार पेरणीमुळे यावर्षी लागवडीच्या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हादरला आहे. पैशांची तडजोड करण्यासाठी शेतकरी सावकारारकडे जमीन गहाण करीत आहे. शिवाय बँकांचे कर्ज थकीत आहे. त्यामुले पुन्हा कर्ज मिळत नाही. अशा भयावह परिस्थितीत दुबार, तिबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांना सावरणे जिकरीचे झाले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)