शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दारूविक्रीमुळे गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:01 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ठळक मुद्देशासनाचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष : पोलीस व उत्पादन शुल्क यंत्रणा सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवैध दारूविक्री यामागे मुख्य कारण असल्याचे सामाजिक संस्थांच्या पाहणीतून दिसून आले आहे.राज्य सरकारने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत दारूबंदी केली आहे; पण मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारू पाठविण्यात येत आहे. नागपूर मार्गे जाम, समुद्रपूर, चंद्रपूर असा दारू वाहतुकीचा कॉरीडोअरच तयार करण्यात आला आहे. दररोज शेकडो वाहनांतून ना-ना युक्त्या वापरून दारूची वाहतूक केली जात आहे. समुद्रपूर पोलिसांनी सहा महिन्यांत पकडलेल्या दारूच्या आकडेवारीवरून चोरट्या मार्गाने होत असलेल्या दारू वाहतुकीचे वास्तव समोर आले आहे. वर्धा शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी व मोहा फुलाची दारू सहजपणे उपलब्ध होत आहे. या अवैध दारूविक्रीमुळे शहरांसह ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. तरूण वर्ग व्यसनाच्या अधीन झाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने दारूबंदी केली असली तरी याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही विशेष यंत्रणा उभारल्याचे दिसून येत नाही. शिवाय दारूबंदी उत्पादन शुल्क विभागात तीनही जिल्ह्यांत जवळपास दीडशेच्या वर अधिक पदे रिक्त आहेत. ती कधीही भरलीच जात नाहीत. वर्धा दारूबंदी उत्पादन शुल्क विभागात कारवाईसाठीही चंद्रपूर कार्यालयातून पोलीस निरीक्षक व कर्मचारी येतात, ही स्थिती आहे. यामुळे या विभागाकडून अवैध दारूविक्री विरूद्ध मोहीमच बंद करण्यात आल्या आहेत.घोषणा हवेतचराज्य शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदी केली आहे. वर्धा व गडचिरोलीचा दारूबंदीचा निर्णय फारसा यशस्वी झाला नसतानाही १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी करताना राज्य सरकारने या तीनही जिल्ह्यांत व्यसनमुक्तीचा कार्यक्रम धडकपणे राबविण्यासाठी निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. शिवाय दारूबंदी जिल्ह्याच्या सिमेपासून २५ किलोमीटर अंतरातील सर्व दारूची परवानाप्राप्त दुकाने बंद करण्यात येईल. दारूच्या केसेसमध्ये तपासणी अहवाल तत्काळ यावा, यासाठी फिरती प्रयोगशाळा उघडण्यात येईल, असे जाहीर केले होते; पण यातील एकही घोषणा अद्याप मूर्त रूपात साकारली नाही. यामुळे दारूबंदीबाबतच्या सर्व घोषणा हवेतच विरत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.