शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीमुळे गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:01 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ठळक मुद्देशासनाचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष : पोलीस व उत्पादन शुल्क यंत्रणा सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवैध दारूविक्री यामागे मुख्य कारण असल्याचे सामाजिक संस्थांच्या पाहणीतून दिसून आले आहे.राज्य सरकारने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत दारूबंदी केली आहे; पण मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारू पाठविण्यात येत आहे. नागपूर मार्गे जाम, समुद्रपूर, चंद्रपूर असा दारू वाहतुकीचा कॉरीडोअरच तयार करण्यात आला आहे. दररोज शेकडो वाहनांतून ना-ना युक्त्या वापरून दारूची वाहतूक केली जात आहे. समुद्रपूर पोलिसांनी सहा महिन्यांत पकडलेल्या दारूच्या आकडेवारीवरून चोरट्या मार्गाने होत असलेल्या दारू वाहतुकीचे वास्तव समोर आले आहे. वर्धा शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी व मोहा फुलाची दारू सहजपणे उपलब्ध होत आहे. या अवैध दारूविक्रीमुळे शहरांसह ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. तरूण वर्ग व्यसनाच्या अधीन झाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने दारूबंदी केली असली तरी याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही विशेष यंत्रणा उभारल्याचे दिसून येत नाही. शिवाय दारूबंदी उत्पादन शुल्क विभागात तीनही जिल्ह्यांत जवळपास दीडशेच्या वर अधिक पदे रिक्त आहेत. ती कधीही भरलीच जात नाहीत. वर्धा दारूबंदी उत्पादन शुल्क विभागात कारवाईसाठीही चंद्रपूर कार्यालयातून पोलीस निरीक्षक व कर्मचारी येतात, ही स्थिती आहे. यामुळे या विभागाकडून अवैध दारूविक्री विरूद्ध मोहीमच बंद करण्यात आल्या आहेत.घोषणा हवेतचराज्य शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदी केली आहे. वर्धा व गडचिरोलीचा दारूबंदीचा निर्णय फारसा यशस्वी झाला नसतानाही १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी करताना राज्य सरकारने या तीनही जिल्ह्यांत व्यसनमुक्तीचा कार्यक्रम धडकपणे राबविण्यासाठी निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. शिवाय दारूबंदी जिल्ह्याच्या सिमेपासून २५ किलोमीटर अंतरातील सर्व दारूची परवानाप्राप्त दुकाने बंद करण्यात येईल. दारूच्या केसेसमध्ये तपासणी अहवाल तत्काळ यावा, यासाठी फिरती प्रयोगशाळा उघडण्यात येईल, असे जाहीर केले होते; पण यातील एकही घोषणा अद्याप मूर्त रूपात साकारली नाही. यामुळे दारूबंदीबाबतच्या सर्व घोषणा हवेतच विरत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.