शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:28 IST

शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवामनराव चटप : आधारवड व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

ऑनलाईन लोकमतवर्धा : शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार आणि भरत ज्ञान मंडळ, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित आधारवड व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर, आधारवडचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव चंद्रशेखर दंढारे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सर्व सेवा संघाचे प्रसादजी उपस्थित होते.यावेळी वामनराव चटप यांनी आकडेवारीतून आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी नोकरभरती बंदच आहे. रोजगाराच्या संधी सतत दडपत असून बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. घाट्यातील शेती, नोकऱ्यांचा अभाव, आयात-निर्यातीचे बिघडलेले संतुलन यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी एकतर आत्महत्येचा किंवा शहराकडे पलायनाचा मार्ग स्वीकारत आहेत. परिणामी शहराची भरमसाठ वाढ होत आहे. एकट्या मुंबई शहरात लोकसंख्येच्या ५५ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत ओंगळवाणे जीवन जगण्यास बाध्य आहे. कारण शहर वाढतात त्याप्रमाणात मुलभूत सुविधा नसतात, परिणामी रोगराईचे प्रमाण वाढत आहे. भांडवलशाहीतील भोगवादी प्रवृत्तीच्या आकर्षणामुळे वहावत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य यापुढे ज्येष्ठ नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विदर्भाचे नष्टचर्य संपवावयाचे असेल तर विदर्भाचे वेगळे राज्य हाच एकमेव उपाय आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.कार्यक्रमाचे सुरुवातीला वामनराव चटप यांचा संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून भरत ज्ञान मंडळीचे सदस्य अरूण काशीकर यांनी सत्कार केला.अ‍ॅड. मोहन देशमुख यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि सद्यस्थिती या विषयावर भूमिका मांडली. वक्त्यांचा परिचय पांडुरंग भालशंकर यांनी दिला. सूत्रसंचालन चंद्रशेखर दंढारे यांनी केले तर जिल्हा संघटक शेखर सोळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्यामकांत देशपांडे, हरीष तांदळे, माजी आमदार सरोज काशीकर, रवी काशीकर, मदन मोहता, व्ही.एम. देशमुख, पुरुषोत्तम पोफळी, गुणवंत डखरे, डॉ. एरकेवार, शेषराव बीजवार, बी.वाय. बागदरकर, अ‍ॅड. एन.जे. भोयर, अ‍ॅड. अशोक वाघ, प्रा. अनिल दुबे, संजय इंगळे तिगावकर, मनोहर पंचरिया, शेतकरी संघटना, कामगार संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, परिषद तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अप्रत्यक्ष कराचा बोजा सामान्यांवरदेशातील ७३ टक्के संपत्ती फक्त एक टक्का लोकांजवळ अर्थात कार्पोरेट घराण्यांकडे केंद्रीत झाली आहे. मात्र हा वर्ग ५० टक्के अप्रत्यक्ष करांपैकी फक्त एक टक्काच कर भरतो. देशातील ९९ टक्के लोकांच्या वाट्याला केवळ २७ टक्के संपत्ती आलेली असून ४९ टक्के अप्रत्यक्ष कराचा भार त्यांच्यावर पडत आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेचे धोरण असले तरी भारतात भांडवलवादी अर्थव्यवस्था असल्याचे चटप यांनी स्पष्ट केले.