शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

गावात मतदानाच्या दिवशीच मतमोजणी

By admin | Updated: November 29, 2014 01:56 IST

सन २०१५ नंतर ज्या ज्या गावात निवडणूका होईल, त्या गावात मतदारानंतर लगेच एका तासाने मतमोजणी करून त्वरीत तसेच ...

कारंजा (घाडगे): सन २०१५ नंतर ज्या ज्या गावात निवडणूका होईल, त्या गावात मतदारानंतर लगेच एका तासाने मतमोजणी करून त्वरीत तसेच निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाचा विचाराधीन आहे. या संदर्भात तहसील कार्यालयात गुरूवारी सभा झाली. या सभेत निवडणूक प्रक्रियेतील हा बदल व्यवहार्य राहील किंवा नाही, यावर विचार विनिमय करण्याबाबत चर्चा झाली. निवडणूक आयोगाने शासनामार्फत तालुका स्तरावर पोलीस खाते, विद्युत खाते, तसेच महसूल खाते, आणि सर्व पक्षीय नेते आणि पत्रकाराची तातडीची सभा घेऊन मत मागितले आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार बालपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत या विषयावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान अनेकांनी हे शक्य नसल्याच्या प्रतिक्रीया दिल्या. या बैठकीत १ जानेवारी २०१५ ला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रवृत्त करावे. लग्न झालेल्या मुलींनी आपले नाव माहेरच्या यादीतून कमी करून सासरच्या गावात नोंदणी करावी. मृतकाची नावे यादीतून कमी करण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी, नवीन ठिकाणी नावे नोंदवावी. नावात, आडनावात, लिंग व नात्यात बदल झाला असेल तर विशिष्ट प्रपत्र भरून दुरूस्त करून घ्यावे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.या सभेला सभापती मोरेश्वर भांगे, उपसभापती पठाडे, माजी उपसभापती चौधरी, पंचायत समिती सदस्य संगीता खोडे, खवशी, भुतडा, तेजराव बन्नगरे, प्रा. अनिल भांगे, अभियंता वानखेडे उपस्थित होते. सभेचे संचालन नायब तहसीलदार राठोड यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)