शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

वेचणीच्या कापसाला दहा दिवसात फुटले कोंब; शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:48 IST

Wardha News Cotton कापूस वेचणी करून घरात भरून ठेवल्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्याला पुन्हा कोंब फुटल्याने वर्धा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देपाईकमारी येथील शेतकरी कैलास देवतळे व गणेश लढी यांच्या शेतात घडला प्रकार८ एकरांतील निघाला होता २० किंटल कापूसकोंब फुटून असलेल्या कापसाला किती मिळणार भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: यंदाच्या वर्षी सततच्या पावसाने जिल्ह्यातील कापुस उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. समुद्रपुर तालुक्यातील पाईकमारी या गावातील दोन शेतकऱ्यांना ८ एकर शेतजमिनीवर कापुस उत्पादन्न घेण्यासाठी ८५ हजाराचा खर्च आला आहे.पण प्रत्यक्षात कापसाची वेचणी केल्यावर या शेतकऱ्याला सध्या २० क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले व तो कापुस त्यांनी घरात भरुन ठेवला असता त्या कापसाला फक्त दहाच दिवस झाले असतांनाच कापसाला अक्षरश: कोंबच फुटले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील पाईकमारी येथील रहिवासी असलेले कैलास देवतळे व गणेश लढी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला त्यांच्या शेतात ८ एकर शेतात कापसाची लागवड केली होती सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने पाहाणी असल्याने पिकाची वाढ व फुले बोंडे बऱ्याच पैकी होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पिकांची परिस्थिती बघितल्यावर भरघोस उत्पन्न होईल असे वाटत होते. परंतु सप्टेंबर महिन्यात आलेल्या सततच्या पावसाने उभ्या फुटलेल्या कापसाच्या पिकाला चांगलाच फटका बसवला व त्यामुळे कापुस शेतातच पडायला लागला.

अशातच सम्पुर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने आणि हवामान खात्याकडून पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या दोन्ही शेतकऱ्यांनी घावपड करत वेचणी करीता मजुर आणले व शेतातील कापसाची वेचणी केली. वेचणी अंती त्यांना कापसाचे ८ एकर मध्ये एकूण २० क्विंटल उत्पन्न झाले व त्यांनी ह्या कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने कापुस घरी भरुन ठेवला. परंतु कापसाला घरीच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्पादकांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकरी कैलास देवतळे व गणेश लढी यांनी केली आहे. हीच परिस्थिती जर पुन्हा काही शेतकऱ्यांनवर येण्याची वेळ असून हवालदिल शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस